शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शहरात प्रदूषण मोजणारी तीन यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:19 IST

ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजनतेचे आरोग्य धोक्यात : सहा वर्षांपूर्वी लागली यंत्रे, प्रदूषणात कमालीची वाढ

मनीष कहाते।आॅनलाईन लोकमतअमरावती : ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत. यंत्र केवळ एक किलोमीटरच्या परिसरातील वायुप्रदूषणाची मोजदाद करते. त्यामुळे जिथे यंत्र नाही, त्या परिसरातील जनतेच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न निमार्ण झाला आहे.शहरात महापालिका इमारत, शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज आणि एम.आय.डी.सी. परिसरात वायुप्रदूषण मोजणारे यंत्र सहा वर्षांपूर्वी बसविण्यात आले. ती यंत्रे आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहतात. १०० एम.क्यू. मिलीग्रॅम प्रदूषण म्हणजे साधारण असते. वर्षभरात वायुप्रदूषण १०० एम.क्यू. मिलिग्रॅम पेक्षा वर गेले आहे. यंत्र आणि त्याचे त्याचे मोजमाप महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करते. प्रदूषणात वाढ झाली असल्यास मंडळ महानगरपालिकेला कळविते. त्यावर महानगरपालिका उपाययोजना करते, अशी एकंदर प्रक्रिया आहे. शहरात सर्वाधिक वाहनामुळे प्रदूषण होत आहे परंतु त्यावर उपाय होताना दिसत नाही. सर्वच यंत्रे भंगार झाली आहेत.घनकचरा प्रदूषणामुळे सल्फर डायआॅक्साइड, मिथेन, अमोनिया, कार्बन मोनाआॅक्साईड इत्यादी वायू आपोआप तयार होतात. त्यामुळे प्रदूषण वाढते. याची मोजमाप दर महिन्यातून फक्त एकदा होते. यंत्र घनकचºयाच्या ढिगाºयाजवळ काही तास ठेवले जातात. 'सल्फर डायआॅक्साइड ५०० सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर' असे त्याचे मापन आहे. ५०० म्हणजे सर्वसाधारण आहे. परंतु, त्यापेक्षा वर आहे. मिथेन वायू ६५० एम. जी. परमीटर सर्वसाधारण पाहिजे. पण, तेही वर आहे. त्यामुळे घनकचऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त प्रदूषण मोजते. परंतु कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे नाही.जल प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. सांडपाण्याची नदी, छोट्या-मोठ्या नाल्या यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा आहे. संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक आखले जातात. पाणी मोजण्याचेही यंत्र आहे. पाच लीटर पाण्याचा नमुना तपासणीकरिता घेतला जातो. त्याचा अहवाल दोन महिन्यांनी येतो. कारखान्यातील दूषित पाणी, सांडपाणी यांचे नमूने घेतले जातात. तपासाअंती काही प्रदूषण आढळले तर केवळ कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. शहरात सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने साम्राज्य निर्माण केले आहे. परंतु कागदपत्राचा प्रवास या कार्यालयातून त्या कार्यालयात होतो. मात्र, त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. या जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणतेही कार्यालय गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.येत्या काही दिवसांत वायू मोजण्याचे यंत्र वाढविण्याचे विचाराधीन आहे. मुंबईतील कार्यालयातून यंत्राच्या संख्येची वाढ होते. शहरात सर्वाधिक प्रदूषण वाहनांचे आहे.- नागेश लोहळकर,प्रादेशिक अधिकारी, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ