शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

शहरात प्रदूषण मोजणारी तीन यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:19 IST

ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजनतेचे आरोग्य धोक्यात : सहा वर्षांपूर्वी लागली यंत्रे, प्रदूषणात कमालीची वाढ

मनीष कहाते।आॅनलाईन लोकमतअमरावती : ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत. यंत्र केवळ एक किलोमीटरच्या परिसरातील वायुप्रदूषणाची मोजदाद करते. त्यामुळे जिथे यंत्र नाही, त्या परिसरातील जनतेच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न निमार्ण झाला आहे.शहरात महापालिका इमारत, शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज आणि एम.आय.डी.सी. परिसरात वायुप्रदूषण मोजणारे यंत्र सहा वर्षांपूर्वी बसविण्यात आले. ती यंत्रे आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहतात. १०० एम.क्यू. मिलीग्रॅम प्रदूषण म्हणजे साधारण असते. वर्षभरात वायुप्रदूषण १०० एम.क्यू. मिलिग्रॅम पेक्षा वर गेले आहे. यंत्र आणि त्याचे त्याचे मोजमाप महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करते. प्रदूषणात वाढ झाली असल्यास मंडळ महानगरपालिकेला कळविते. त्यावर महानगरपालिका उपाययोजना करते, अशी एकंदर प्रक्रिया आहे. शहरात सर्वाधिक वाहनामुळे प्रदूषण होत आहे परंतु त्यावर उपाय होताना दिसत नाही. सर्वच यंत्रे भंगार झाली आहेत.घनकचरा प्रदूषणामुळे सल्फर डायआॅक्साइड, मिथेन, अमोनिया, कार्बन मोनाआॅक्साईड इत्यादी वायू आपोआप तयार होतात. त्यामुळे प्रदूषण वाढते. याची मोजमाप दर महिन्यातून फक्त एकदा होते. यंत्र घनकचºयाच्या ढिगाºयाजवळ काही तास ठेवले जातात. 'सल्फर डायआॅक्साइड ५०० सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर' असे त्याचे मापन आहे. ५०० म्हणजे सर्वसाधारण आहे. परंतु, त्यापेक्षा वर आहे. मिथेन वायू ६५० एम. जी. परमीटर सर्वसाधारण पाहिजे. पण, तेही वर आहे. त्यामुळे घनकचऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त प्रदूषण मोजते. परंतु कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे नाही.जल प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. सांडपाण्याची नदी, छोट्या-मोठ्या नाल्या यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा आहे. संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक आखले जातात. पाणी मोजण्याचेही यंत्र आहे. पाच लीटर पाण्याचा नमुना तपासणीकरिता घेतला जातो. त्याचा अहवाल दोन महिन्यांनी येतो. कारखान्यातील दूषित पाणी, सांडपाणी यांचे नमूने घेतले जातात. तपासाअंती काही प्रदूषण आढळले तर केवळ कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. शहरात सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने साम्राज्य निर्माण केले आहे. परंतु कागदपत्राचा प्रवास या कार्यालयातून त्या कार्यालयात होतो. मात्र, त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. या जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणतेही कार्यालय गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.येत्या काही दिवसांत वायू मोजण्याचे यंत्र वाढविण्याचे विचाराधीन आहे. मुंबईतील कार्यालयातून यंत्राच्या संख्येची वाढ होते. शहरात सर्वाधिक प्रदूषण वाहनांचे आहे.- नागेश लोहळकर,प्रादेशिक अधिकारी, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ