शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

शहरात प्रदूषण मोजणारी तीन यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:19 IST

ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजनतेचे आरोग्य धोक्यात : सहा वर्षांपूर्वी लागली यंत्रे, प्रदूषणात कमालीची वाढ

मनीष कहाते।आॅनलाईन लोकमतअमरावती : ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत. यंत्र केवळ एक किलोमीटरच्या परिसरातील वायुप्रदूषणाची मोजदाद करते. त्यामुळे जिथे यंत्र नाही, त्या परिसरातील जनतेच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न निमार्ण झाला आहे.शहरात महापालिका इमारत, शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज आणि एम.आय.डी.सी. परिसरात वायुप्रदूषण मोजणारे यंत्र सहा वर्षांपूर्वी बसविण्यात आले. ती यंत्रे आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहतात. १०० एम.क्यू. मिलीग्रॅम प्रदूषण म्हणजे साधारण असते. वर्षभरात वायुप्रदूषण १०० एम.क्यू. मिलिग्रॅम पेक्षा वर गेले आहे. यंत्र आणि त्याचे त्याचे मोजमाप महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करते. प्रदूषणात वाढ झाली असल्यास मंडळ महानगरपालिकेला कळविते. त्यावर महानगरपालिका उपाययोजना करते, अशी एकंदर प्रक्रिया आहे. शहरात सर्वाधिक वाहनामुळे प्रदूषण होत आहे परंतु त्यावर उपाय होताना दिसत नाही. सर्वच यंत्रे भंगार झाली आहेत.घनकचरा प्रदूषणामुळे सल्फर डायआॅक्साइड, मिथेन, अमोनिया, कार्बन मोनाआॅक्साईड इत्यादी वायू आपोआप तयार होतात. त्यामुळे प्रदूषण वाढते. याची मोजमाप दर महिन्यातून फक्त एकदा होते. यंत्र घनकचºयाच्या ढिगाºयाजवळ काही तास ठेवले जातात. 'सल्फर डायआॅक्साइड ५०० सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर' असे त्याचे मापन आहे. ५०० म्हणजे सर्वसाधारण आहे. परंतु, त्यापेक्षा वर आहे. मिथेन वायू ६५० एम. जी. परमीटर सर्वसाधारण पाहिजे. पण, तेही वर आहे. त्यामुळे घनकचऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त प्रदूषण मोजते. परंतु कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे नाही.जल प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. सांडपाण्याची नदी, छोट्या-मोठ्या नाल्या यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा आहे. संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक आखले जातात. पाणी मोजण्याचेही यंत्र आहे. पाच लीटर पाण्याचा नमुना तपासणीकरिता घेतला जातो. त्याचा अहवाल दोन महिन्यांनी येतो. कारखान्यातील दूषित पाणी, सांडपाणी यांचे नमूने घेतले जातात. तपासाअंती काही प्रदूषण आढळले तर केवळ कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. शहरात सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने साम्राज्य निर्माण केले आहे. परंतु कागदपत्राचा प्रवास या कार्यालयातून त्या कार्यालयात होतो. मात्र, त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. या जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणतेही कार्यालय गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.येत्या काही दिवसांत वायू मोजण्याचे यंत्र वाढविण्याचे विचाराधीन आहे. मुंबईतील कार्यालयातून यंत्राच्या संख्येची वाढ होते. शहरात सर्वाधिक प्रदूषण वाहनांचे आहे.- नागेश लोहळकर,प्रादेशिक अधिकारी, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ