शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

व-हाडात तीन हजारांवर गावे तहानली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:41 IST

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे.

 - गजानन मोहोड   

अमरावती - विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यालयाने ५,५२९  उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर ७९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.यंदा पावसाळ्यात  ७७७.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ५८१ मिमी पडला. या चार महिन्यात केवळ ३६ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी ही दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणीटंचाईची स्थिती जिल्हा प्रशासनाला विशद केली. मात्र, सर्वच जिल्हा परिषदांद्वारा हा गंभीर विषय दुर्लक्षित करण्यात आला. त्यामुळेच पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यांना विलंब झाला. विभागीय आयुक्तांनी याविषयी संबंधितांचे कान उपटल्यानंतर तब्बल महिनाभर उशिराने आराखडा तयार करण्यात आला. त्याचा एकत्रित कृती आराखडा गुरुवारी तयार करण्यात आला. विभागात जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान १,९१५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी २६५३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ३४ कोटी ४५ लाख ७६ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत १,३११ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. याचा सामना करण्यास १,६४१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ११ कोटी ५४ लाख ४८ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये  २६६ गावांतील ४३७ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येणार आहे. यावर २.४३ कोटी खर्च होतील. २,२८० गावांमध्ये २५१२ खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर १३.२३ कोटी, ५०३ गावांमध्ये ५२१ टँकरद्वारा पाणीपुरवठ्यावर १८.५८ कोटी, ५३१ गावांमध्ये नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर १९.५२ कोटी, ७९ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती, १,००७ गावांमध्ये १,१७१ नवीन विंधन विहिरींवर १०.७० कोटी, तर २९७ गावांमध्ये २३७ तात्पुरत्या नळ योजना तयार करण्यासाठी १५.३१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.टंचाईग्रस्त गावे, उपाययोजना व निधीअमरावती जिल्ह्यात १४२८ गावांसाठी १७४५ उपाययोजनांवर १७.९९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अकोला जिल्ह्यात ५३४ गावांतील १०८४ उपायोजनांवर २६.८५ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ७९७ गावांतील १२१९ उपाययोजनांवर १८.९४ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६७० गावांतील ९०३ उपाययोजनांवर १०.७९ कोटी व वाशिम जिल्ह्यात ५१० गावांसाठी ५७८ उपाययोजनांवर ४.४९ कोटींचा निधी खर्च होणार आहे. विभागातील जलप्रकल्पांमध्येदेखील सरासरी ४२ टक्केच साठा आहे. अकोला जिल्ह्यात ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती