शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘स्वयंम’पासून हजारो आदिवासी विद्यार्थी वंचित; संकेतस्थळ ‘जैसे थे’

By गणेश वासनिक | Updated: December 10, 2023 19:31 IST

शासनाने वयाची अट ३० वर्षे केली; पण आयुक्तालयातून सुधारणाच नाही.

गणेश वासनिक, अमरावती : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती असल्यामुळे शासकीय वसतिगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या हजारोे विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेपासून मुकावे लागले आहे. शासनाने या याेजनेसाठी वयाची अट २८ ऐवजी ३० वर्षे केली तरिही ‘ट्रायबल’च्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी विद्यार्थी सैरभैर झाले आहेत.

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीनंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या; परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण २० हजार संख्येच्या मर्यादित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तर व मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देय असलेली रक्कम थेट जमा करण्याबाबत ' पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना सुरू करण्यात आली आहे.अशी आहे खर्चाची तरतूद

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई ,ठाणे ,पुणे ,पिंपरी-चिंचवड, नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी वार्षिक खर्च ६० हजार रुपये, तर महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च ५१ हजार रुपये दिले जाते.शासन निर्णय निर्गमित करुन सात महिने झाले. वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही म्हणून विद्यार्थी रूम करुन भाड्याने राहतात. भोजनासाठी मेस लावतात. शैक्षणिक साहित्याचा खर्च करतात. आता विद्यार्थी स्वयं योजनेसाठी अर्ज करीत आहेत तर अपात्र दाखवितात. शासन निर्णयानुसार तत्काळ संगणकीय प्रणालीमध्ये बदल करुन विद्यार्थ्यांना स्वयं योजनेची संधी उपलब्ध करुन द्यावी. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.

टॅग्स :Educationशिक्षण