शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तहानेने व्याकूळ १६ माकडांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:21 IST

वाई साठवण तलावालगतच ही घटना घडल्याने अन्य वन्यप्राण्यांचा पाण्याअभावी जीव जाऊ नये, यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

शेंदूरजनाघाट (अमरावती) : वरूड वनपरिक्षेत्रातील वाई परिसरात आठ दिवसांत १६ माकडांचा पाण्याअभावी मृत्यू झाला. जंगलातील नैसर्गिक-कृत्रिम पाणवठ्यांना पडलेली कोरड आणि गावागावांतील तीव्र पाणीटंचाई यामुळे त्या माकडांना पाण्यावाचून जीव गमवावा लागल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला.

वाई साठवण तलावालगतच ही घटना घडल्याने अन्य वन्यप्राण्यांचा पाण्याअभावी जीव जाऊ नये, यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. वन्यजिवांची तहान भागविण्याकरिता कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. मात्र, त्या पाणवठ्यात टाकण्याकरिता पाणी मिळत नाही. या जंगलात माकडे, मोर, निलगाय, वाघ, बिबटासह अन्य वन्यजीव वास्तव्य आहेत. 

१५ दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने वन्यप्राण्यांना उष्माघातासह तीव्र पाणीटंचाईचा फटका बसला. पाणी न मिळाल्याने व्याकूळ झालेल्या १६ ते १७ माकडांचा दुर्देवी मृत्यू झाला. वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांनी या घटनेला दुजोरा दिला. वनरक्षक विशाल अंबागडे व अन्य वनकर्मचाºयांनी मृत माकडांचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी चेडे यांनी शवविच्छेदन केले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई