शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

‘ते’ चार संकुल ताब्यात घेणार

By admin | Updated: June 6, 2015 01:17 IST

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारलेले चार संकुल करारनामे संपण्यापूर्वीच ताब्यात

बीओटी कंत्राटदाराची मुस्कटदाबी : आमसभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचालीअमरावती : बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारलेले चार संकुल करारनामे संपण्यापूर्वीच ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. बीओटी कंत्राटदारांनी चालविलेल्या नियमबाह्य कामांना लगाम लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्याअनुषंगाने येत्या आमसभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू आहे.स्थानिक जवाहर गेटनजीकचे खत्री कॉम्प्लेक्स, महापालिका इमारत परिसरातील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस व दादासाहेब खापर्डे संकुल तर जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे संकुल महापालिका प्रशासनाने बीओटीवर साकारले असून या चारही संकुलांचे करारनामे हे सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे; तथापि दादासाहेब खापर्डे व खत्री कॉम्प्लेक्सच्या बीओटी कंत्राटदाराने प्रशासनाला विश्वासात न घेता काही गाळेधारकांशी परस्पर करारनामे केल्याचे बाजार व परवाना विभागाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असताना कंत्राटदारांनी परस्पर करारनामे करुन लाखो रुपयांना गाळे विकण्याचा सपाटा चालविला आहे.याप्रकरणी उपायुक्त चंदन पाटील हे लक्ष ठेवून आहेत. परंतु महापालिका उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने या चारही संकुलाचे करार संपण्यापूर्वीच ते ताब्यात घेण्यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करणे आवश्यक आहे. गाळे वाटपासाठी काढणार निविदा४बीओटी तत्त्वावरील हे चारही संकुल ताब्यात घेतल्यानंतर महापालिका या संकुलात गाळे वाटपासाठी खुल्या निविदा काढून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये गाळे वाटप निविदामधून येतील. तसेच या संकुलात होत असलेल्या गैरव्यवहाराला आळादेखील बसवता येईल.ही आहेत बीओटीची चार संकु ले४सन २०१८ मध्ये बीओेटी तत्त्वावरील करारनामे संपणारी ही चार संकुले आहेत. यात खत्री कॉम्प्लेक्स, प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुल, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस संकुल व दादासाहेब खापर्डे संकुलाचा समावेश आहे.जुन्या करारनाम्यानुसार अटी, शर्थीचे उल्लंघन झाल्यास संकुल करार संपण्यापूर्वी ताब्यात घेता येते. सर्वसाधारण सभा, आयुक्तांची मान्यता आवश्यक राहील. सद्या या विषयी काही बोलणे संयुक्तिक नाही. - चंदन पाटील, उपायुक्त, महापालिका.बीओटी संकुलात उघडकीस आलेल्या गैरव्यवहाराने प्रशासनाची नामुष्की झाली आहे. या चार संकुलाचे करारानामे संपायला दोन ते अडीच वर्षे शिल्लक आहे. मात्र उत्पन्नवाढीसाठी निर्णय योग्य राहील.- विलास इंगोले, सभापती, स्थायी समिती.करार संपण्यापूर्वी गाळेधारकांना संकुलातून बाहेर काढणे योग्य नाही. नव्याने अटी, शर्थी लादून त्याच दुकानदारांना न्याय मिळावा, असे धोरण निश्चित करावे. अन्यथा न्यायालयात धाव घेऊ. - अजय मिराणी, गाळेधारक.