शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

फरदळ घेणे भोवणार बोंडअळी उद्रेक होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:05 IST

Amravati : कपाशीची पूर्वहंगामी लागवडही ठरणार घातक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या खरिपात मार्चपर्यंत काही शेतकऱ्यांनी घेतलेला कपाशीचा खोडवा व कृषी विभागाने १६ मे पासून बीटी बियाणे विक्रीला दिलेली परवानगी यामुळे कपाशीची पूर्वहंगामी लागवड होणार आहे. यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने यंदाच्या खरिपात बोंडअळीचा धोका कित्येक पटीने वाढला आहे.

दरवर्षी ३१ मेपर्यंत बियाणे विक्रीस प्रतिबंध होता. यंदा मात्र १६ मेपासून बियाणे विक्रीची मुभा दिलेली आहे. अशा परिस्थितीत हंगामपूर्व कपाशीची लागवड झाल्यास बोंडअळीचे नियंत्रण कसे करणार, यासाठी जबाबदार कोण ? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यापूर्वी सन २०१७ हंगामात गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झाला होता. त्यानंतर सातत्याने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. यापूर्वी बीटी बियाणांची ३१ मेपर्यंत विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. यंदा मात्र १६ मेपासून बीटी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास यंदादेखील प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हंगामपूर्व कपाशीची लागवड झाल्यास बोंडअळीच्या जीवनक्रमाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

कंपन्यांच्या दबावात निर्णय, शेतकऱ्यांचा आरोप●  दरवर्षी १ जूननंतर तर यंदा मात्र १६ मेपासून बियाणे विक्री खुली करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांच्याद्वारा हंगामपूर्व बीटी कपाशीची लागवड झाल्यास पुन्हा बोंडअळीचे संकट ओढवणार आहे.

●  या दिवसात नांगरणी व कडक उन्हानंतर बोंडअळीचे पतंग नष्ट होण्याची शक्यता असते; मात्र १५ दिवस पूर्व बियाणे विक्री खुली केल्याचा निर्णय बियाणे कंपन्यांच्या दबावात घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

●  गतवर्षीच्या खरीप हंगामातील कपाशीचा खोडवा यंदा मार्चपर्यंत घेण्यात आला. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्याऐवजी तिला खाद्य मिळाल्याने यंदा बोंडअळीच्या उद्रेकाची शक्यता आहे.

उशिराच पेराबोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व पेरणी टाळावी.

यंदा १६ मेपासून बियाणे विक्री होणार असल्याने ड्रीपवर काही शेतकरी हंगामपूर्व कपाशी लागवड करतील. शिवाय काही शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कपाशीचा खोडवा घेतला, त्यामुळे यंदाच्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.- पवन देशमुख, कृषितज्ज्ञ 

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र