शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वरूड तालुक्यात २८ गावांत टंचाई, शहरांत सहा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:18 IST

तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

ठळक मुद्देपळसोना गावात टँकरचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पळसोना गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ३० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.यावर्षी पर्जन्यमान अल्प झाल्याने नदी-नाले, प्रकल्प कोरडेच राहिले. अवैध बोअरने अमर्याद उपसा केल्याने भूजल पातळी खालावली. त्याअनुषंगाने नुकताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्याचा दौरा करून जलसंधारण व पाणीटंचाईचा आढावा घेतला. करवार, सातनूर, बेनोडा, माणिकपूर व गव्हाणकुंडला भेट दिली. पळसोना येथे चार टँॅकर सुरू करण्याचे आदेश नवाल यांनी दिल्याचे नायब तहसीलदार सुदर्शन सहारे म्हणाले. विश्रामगृहावर महसूल, बांधकाम, कृषी, पं.स. अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागांप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पुरेशी साठवणक्षमता नसल्याने नागरिकांची परवड होत आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे. जमालपूर येथून २६ किमी हून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला दरदिवशी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले आहे. शहरात दोन जलकुंभ असून त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटरची आहे. त्यामुळे पळसोना गावाला टँकरने पुरवठा होत आहे.शहरातही हाहकारशहरात ९ हजार ५०० नळपुरवठाधारक आहेत. ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टॅन्डपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. भूजलपातळी खालावल्याने शहरातील ९० टक्के विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना नळावरच अवलंबून राहावे लागते. जमालपूर पंपहाउसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटामार्गे येत असल्याने काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी चोरल्याने शहराला होणºया पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली होती. त्याचा फटका दोन दिवसांवर येणारे नळ हे पाच ते सहाव्या दिवशी येऊ लागले. शहराबाहेरील वसाहतींमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगरपरिषदेने तीन टँकर सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई