शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

वरूड तालुक्यात २८ गावांत टंचाई, शहरांत सहा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:18 IST

तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

ठळक मुद्देपळसोना गावात टँकरचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पळसोना गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ३० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.यावर्षी पर्जन्यमान अल्प झाल्याने नदी-नाले, प्रकल्प कोरडेच राहिले. अवैध बोअरने अमर्याद उपसा केल्याने भूजल पातळी खालावली. त्याअनुषंगाने नुकताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्याचा दौरा करून जलसंधारण व पाणीटंचाईचा आढावा घेतला. करवार, सातनूर, बेनोडा, माणिकपूर व गव्हाणकुंडला भेट दिली. पळसोना येथे चार टँॅकर सुरू करण्याचे आदेश नवाल यांनी दिल्याचे नायब तहसीलदार सुदर्शन सहारे म्हणाले. विश्रामगृहावर महसूल, बांधकाम, कृषी, पं.स. अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागांप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पुरेशी साठवणक्षमता नसल्याने नागरिकांची परवड होत आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे. जमालपूर येथून २६ किमी हून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला दरदिवशी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले आहे. शहरात दोन जलकुंभ असून त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटरची आहे. त्यामुळे पळसोना गावाला टँकरने पुरवठा होत आहे.शहरातही हाहकारशहरात ९ हजार ५०० नळपुरवठाधारक आहेत. ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टॅन्डपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. भूजलपातळी खालावल्याने शहरातील ९० टक्के विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना नळावरच अवलंबून राहावे लागते. जमालपूर पंपहाउसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटामार्गे येत असल्याने काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी चोरल्याने शहराला होणºया पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली होती. त्याचा फटका दोन दिवसांवर येणारे नळ हे पाच ते सहाव्या दिवशी येऊ लागले. शहराबाहेरील वसाहतींमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगरपरिषदेने तीन टँकर सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई