शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

- तर अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:32 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकी पेपरच्या मूल्यांकनास प्राध्यापकांना पाठविण्याची सक्ती

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात यासंदर्भात विद्यापीठ कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.उन्हाळी आणि बॅकलॉग असे अभियांत्रिकीचे दोन लाख पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी विद्यापीठाकडे आहे. १५ मे पासून मूल्यांकनास प्रारंभ झाले असले तरी महाविद्यालयातून मूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना पाठविण्याची तसदी प्राचार्यांकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी आल्या असताना त्या व्हॅल्युअरअभावी तशाच पडून आहेत. विषय प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याशिवाय पुढील प्रवास करता येत नाही. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने ज्या १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शून्य मूल्यांकन आहे, अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका परीक्षा विभागात स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी विद्यापीठविरूद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘मूल्यांकन नाही तर उत्तरपत्रिका नाही’ असा आक्रमक पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.

अभियांत्रिकी बॅकलॉगचा निकाल १० दिवसात लागणारअभियांत्रिकी बॅकलॉग पेपरचे मास्कींग पूर्ण झाले असून, पुढील १० दिवसांत निकाल जाहीर केले जातील, अशी तयारी करण्यात आली आहे. ५० पेपरचे निकाल तयार झाले. अभियांत्रिकी बॅकलॉग विषयाचे पेपर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत निकाल जाहीर केले जाणार आहे.१३ अभियांत्रिकी महाविद्यालयांना तंबीमूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना न पाठविणारे १३ अभियांत्रिकी महाविद्यालये अमरावती विद्यापीठाच्या रडारवर आहेत. यात धामणगाव रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील भोसला, मानव आणि शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी, चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथील राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील डॉ. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, खामगाव येथील सिद्धी विनायक अभियांत्रिकी, पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी, वाशिम येथील संमती अभियांत्रिकी आणि अमरावती येथील पी.आर. पोटे आर्किटेक्चर अभियांत्रिकीचा समावेश आहे.

शून्य मूल्यांकन असलेल्या १३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मौखिक ताकिद दिली आहे. दोन दिवसांत विषय प्राध्यापकांना मूल्यांकनाकरिता पाठविले नाही तर अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, असे कळविले आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र