शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

- तर अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:32 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकी पेपरच्या मूल्यांकनास प्राध्यापकांना पाठविण्याची सक्ती

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात यासंदर्भात विद्यापीठ कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.उन्हाळी आणि बॅकलॉग असे अभियांत्रिकीचे दोन लाख पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी विद्यापीठाकडे आहे. १५ मे पासून मूल्यांकनास प्रारंभ झाले असले तरी महाविद्यालयातून मूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना पाठविण्याची तसदी प्राचार्यांकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी आल्या असताना त्या व्हॅल्युअरअभावी तशाच पडून आहेत. विषय प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याशिवाय पुढील प्रवास करता येत नाही. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने ज्या १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शून्य मूल्यांकन आहे, अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका परीक्षा विभागात स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी विद्यापीठविरूद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘मूल्यांकन नाही तर उत्तरपत्रिका नाही’ असा आक्रमक पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.

अभियांत्रिकी बॅकलॉगचा निकाल १० दिवसात लागणारअभियांत्रिकी बॅकलॉग पेपरचे मास्कींग पूर्ण झाले असून, पुढील १० दिवसांत निकाल जाहीर केले जातील, अशी तयारी करण्यात आली आहे. ५० पेपरचे निकाल तयार झाले. अभियांत्रिकी बॅकलॉग विषयाचे पेपर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत निकाल जाहीर केले जाणार आहे.१३ अभियांत्रिकी महाविद्यालयांना तंबीमूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना न पाठविणारे १३ अभियांत्रिकी महाविद्यालये अमरावती विद्यापीठाच्या रडारवर आहेत. यात धामणगाव रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील भोसला, मानव आणि शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी, चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथील राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील डॉ. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, खामगाव येथील सिद्धी विनायक अभियांत्रिकी, पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी, वाशिम येथील संमती अभियांत्रिकी आणि अमरावती येथील पी.आर. पोटे आर्किटेक्चर अभियांत्रिकीचा समावेश आहे.

शून्य मूल्यांकन असलेल्या १३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मौखिक ताकिद दिली आहे. दोन दिवसांत विषय प्राध्यापकांना मूल्यांकनाकरिता पाठविले नाही तर अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, असे कळविले आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र