शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची हप्ताखोरी, अवैध वाहतूक जोरावर

By admin | Updated: March 18, 2017 00:17 IST

अचलपूर शहरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका : जुळ्या शहरात नियमांची ऐशीतैशीपरतवाडा : अचलपूर शहरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे. स्वतंत्र वाहतूक विभाग असताना अवैध वाहतूकदारांच्या खुलेआम दादागिरीचे चित्र पोलिसांच्या हप्ताखोरीने सुरू असल्याचा संतापजनक प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.परतवाडा शहरातील अवैध आणि बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी वाहतूक विभाग कमी पडत असल्याचे दस्तुरखुद्द त्या विभागानेच जाहीर करून टाकले आहे. वाहतूक विभाग नाममात्र असल्याचे चित्र आहे. ३५ पोलीस कर्मचारी कार्यरत असताना केवळ १७ कर्मचाऱ्यांवरच गत वर्षभरापासून कारोभार सुरू आहे. साप्ताहिक सुटी, दोन कार्यालयीन कामात, दोन चालक, बंदोबस्त आणि काही मोक्याच्या ठिकाणी कर्मचारी लावण्यात येत असले, तरी शहरातील महत्त्वपूर्ण अपघातप्रवण स्थळ कर्मचाऱ्यांअभावी बेवारस सोडण्यात आले आहे. बैतुल स्टॉपवर बेशिस्तीचा कहरमिर्झा चौक, बैतुल स्टॉप, लाकूड डेपो रोडवर तर अवैध आणि खासगी वाहतूक मिनीट्रकचा कहर असतो. त्यांना हटकले असता वाहनधारक मुजोरी करतात. तसेच याच परिसरात चार शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंट आहेत. बेशिस्त भरधाव मिनीट्रक आॅटोरिक्शा पाहता मोठा अपघात होण्याची भीती आहे. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी जयंत मीणा यांना तशी लेखी तक्रार जीवनविकास संस्थेचे मुकुंद देशमुख यांनी दिली आहे. या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ राहत असून वाहतूक पोलिसांची नियमित गस्त राहणे गरजेचे आहे. याकडे लक्ष असणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)बसस्थानकातील प्रवाशांची चोरीपरतवाडा शहर जिल्ह्यातील मोठे ठिकाण असल्याने अकोला, दर्यापूर, अंजनगाव, इंदोर, खंडवा, धारणी, चिखलदरा, बैतुल, भैसदेही, चांदूरबाजार, अमरावती या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. परतवाडा स्थानकातून प्रवाशांना नेण्यासाठी दिवसभर स्पर्धा पाहायला मिळते. बसस्थानक परिसरात दोनशे मीटर अंतरापर्यंत खासगी वाहन उभे न करण्याचा नियम आहे. येथे आर्थिक हप्ताखोरीमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. एक चालान, दिवसभर दादागिरीशहरातून दिवसभर विविध मार्गांवर धावणाऱ्या खासगी वाहनांसह ट्रॅव्हल्सला चुकून वाहतूक पोलिसांनी चालान दिले की, नियमानुसार २४ तासांपर्यंत दुसरे चालान देता येत नाही आणि याच नियमाच्या आड दिवसभर खासगी ट्रॅव्हल्सचालकांची दादागिरी शहरात दिसून येते. हे चित्र मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे. दुसरीकडे चालान फाडल्याचे सांगून वाहतूक पोलीसही मोकळे होतात. आॅटोरिक्षाचालकांची अरेरावी, केळीवाले उर्मटअवैध वाहतूक, ट्रॅव्हल्सवाले कमी पडले की काय, त्यावरही कळस पाहता दिवसभर बसस्थानक परिसरात आॅटोरिक्शाचालकांची अरेराव आणि ट्रॅव्हल्सजवळ केळीविक्री करून रस्त्यावरच फेकण्यात येणारी केळींची साल अपघाताला आमंत्रण देत आहेत. कोण लावणार लगाम ?मागील वर्षी तीन महिन्यांत बसस्थानक ते जयस्तंभ चौकापर्यंत ट्रक अपघातात पाच निष्पापांचे बळी गेले. त्यानंतरसुद्धा जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी कायम उपाययोजना न आखता वेळ मारून नेण्यातच धन्यता मानावी, हे विशेष. शहरात वाढती वाहतूक पाहता आमदार बच्चू कडू यांनी चांदूरबाजार नाका ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे कार्य हाती घेतले. अर्ध्याहून अधिक काम झाले असताना बेशिस्त वाहतुकीवर कुणालाच अजून तरी लगाम न लावता आल्याने जुळ्या शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गुरुवारपासून वाहतूक विभागाची सूत्रे घेतली. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात उभ्या असलेल्या सहा वाहनांवर कारवाई केली. अवैध आणि खासगी वाहतुकीची बेशिस्त खपून न घेता कारवाई केली जाईल - बाबाराव अवचार,वाहतूक पोलीस अधिकारी