शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पोलिसांची हप्ताखोरी, अवैध वाहतूक जोरावर

By admin | Updated: March 18, 2017 00:17 IST

अचलपूर शहरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका : जुळ्या शहरात नियमांची ऐशीतैशीपरतवाडा : अचलपूर शहरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे. स्वतंत्र वाहतूक विभाग असताना अवैध वाहतूकदारांच्या खुलेआम दादागिरीचे चित्र पोलिसांच्या हप्ताखोरीने सुरू असल्याचा संतापजनक प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.परतवाडा शहरातील अवैध आणि बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी वाहतूक विभाग कमी पडत असल्याचे दस्तुरखुद्द त्या विभागानेच जाहीर करून टाकले आहे. वाहतूक विभाग नाममात्र असल्याचे चित्र आहे. ३५ पोलीस कर्मचारी कार्यरत असताना केवळ १७ कर्मचाऱ्यांवरच गत वर्षभरापासून कारोभार सुरू आहे. साप्ताहिक सुटी, दोन कार्यालयीन कामात, दोन चालक, बंदोबस्त आणि काही मोक्याच्या ठिकाणी कर्मचारी लावण्यात येत असले, तरी शहरातील महत्त्वपूर्ण अपघातप्रवण स्थळ कर्मचाऱ्यांअभावी बेवारस सोडण्यात आले आहे. बैतुल स्टॉपवर बेशिस्तीचा कहरमिर्झा चौक, बैतुल स्टॉप, लाकूड डेपो रोडवर तर अवैध आणि खासगी वाहतूक मिनीट्रकचा कहर असतो. त्यांना हटकले असता वाहनधारक मुजोरी करतात. तसेच याच परिसरात चार शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंट आहेत. बेशिस्त भरधाव मिनीट्रक आॅटोरिक्शा पाहता मोठा अपघात होण्याची भीती आहे. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी जयंत मीणा यांना तशी लेखी तक्रार जीवनविकास संस्थेचे मुकुंद देशमुख यांनी दिली आहे. या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ राहत असून वाहतूक पोलिसांची नियमित गस्त राहणे गरजेचे आहे. याकडे लक्ष असणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)बसस्थानकातील प्रवाशांची चोरीपरतवाडा शहर जिल्ह्यातील मोठे ठिकाण असल्याने अकोला, दर्यापूर, अंजनगाव, इंदोर, खंडवा, धारणी, चिखलदरा, बैतुल, भैसदेही, चांदूरबाजार, अमरावती या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. परतवाडा स्थानकातून प्रवाशांना नेण्यासाठी दिवसभर स्पर्धा पाहायला मिळते. बसस्थानक परिसरात दोनशे मीटर अंतरापर्यंत खासगी वाहन उभे न करण्याचा नियम आहे. येथे आर्थिक हप्ताखोरीमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. एक चालान, दिवसभर दादागिरीशहरातून दिवसभर विविध मार्गांवर धावणाऱ्या खासगी वाहनांसह ट्रॅव्हल्सला चुकून वाहतूक पोलिसांनी चालान दिले की, नियमानुसार २४ तासांपर्यंत दुसरे चालान देता येत नाही आणि याच नियमाच्या आड दिवसभर खासगी ट्रॅव्हल्सचालकांची दादागिरी शहरात दिसून येते. हे चित्र मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे. दुसरीकडे चालान फाडल्याचे सांगून वाहतूक पोलीसही मोकळे होतात. आॅटोरिक्षाचालकांची अरेरावी, केळीवाले उर्मटअवैध वाहतूक, ट्रॅव्हल्सवाले कमी पडले की काय, त्यावरही कळस पाहता दिवसभर बसस्थानक परिसरात आॅटोरिक्शाचालकांची अरेराव आणि ट्रॅव्हल्सजवळ केळीविक्री करून रस्त्यावरच फेकण्यात येणारी केळींची साल अपघाताला आमंत्रण देत आहेत. कोण लावणार लगाम ?मागील वर्षी तीन महिन्यांत बसस्थानक ते जयस्तंभ चौकापर्यंत ट्रक अपघातात पाच निष्पापांचे बळी गेले. त्यानंतरसुद्धा जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी कायम उपाययोजना न आखता वेळ मारून नेण्यातच धन्यता मानावी, हे विशेष. शहरात वाढती वाहतूक पाहता आमदार बच्चू कडू यांनी चांदूरबाजार नाका ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे कार्य हाती घेतले. अर्ध्याहून अधिक काम झाले असताना बेशिस्त वाहतुकीवर कुणालाच अजून तरी लगाम न लावता आल्याने जुळ्या शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गुरुवारपासून वाहतूक विभागाची सूत्रे घेतली. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात उभ्या असलेल्या सहा वाहनांवर कारवाई केली. अवैध आणि खासगी वाहतुकीची बेशिस्त खपून न घेता कारवाई केली जाईल - बाबाराव अवचार,वाहतूक पोलीस अधिकारी