शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

प्रतीक्षा संपली, अखेर तीन वर्षानंतर एमपीएससीच्या ४२९ अभियंत्यांची नियुक्ती

By गणेश वासनिक | Updated: October 21, 2023 16:54 IST

राज्याच्या जलसंपदा विभागाला उशीरा आली जाग, २०१९ मध्ये झाली होती परीक्षा

चांदूर बाजार (अमरावती) : राज्याच्या जलसंपदा विभागाने गत तीन वर्षांपूर्वी एमपीएससीमार्फत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, तीन वर्षाच्या कालावधी होऊनही या अभियंत्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. परिणामी आमदार बच्चू कडू यांनी जलसंपदा मंत्रालयात गाठून पत्रव्यवहार केला. त्यांच्या स्टाईने ‘प्रहार’ देखील केला. आंदोलनाची धमकी दिली. त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात ४२९ उत्तीर्ण विद्यार्थ्याची अभियंतापदी नियुक्ती केली आहे.

गेल्या तीन वर्षापासून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही ४२९ विद्यार्थ्यांना नियुक्त पत्र मिळाले नव्हते. या विद्यार्थ्याना भविष्य अधांतरी असल्याची भावना निर्माण झाली होती. शासन-प्रशासन स्तरावर या परीक्षार्थींनी पत्र व्यवहार केला. पण ‘मंत्रालयाचे काम, वर्षांनुवर्षे थांब’ असे चालत असल्याचा अनुभव या विद्यार्थ्याना आला. दरम्यान काही विद्यार्थी आत्महत्येचा विचार करीत होते. काहींचे लग्न जुळत नव्हते. हे विद्यार्थी फार अडचणीत होते.

दरम्यान गत काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यानी आमदार बच्चू कडू यांची भेट घेवून आपबीती कथन केली. तसेच त्यांना नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर आ. कडू यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जलसंपदा मंत्रालय गाठले आणि अभियंतापदी नियुक्ती करण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिला. प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आमदार कडू यांनी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषणाची नोटीस देखील दिली होती. अखेर २० ऑक्टोबर २०२३ रोजी जलसंपदा विभागाने शासन निर्णय जारी करीत ४९५ पात्र उमेदवारापैकी ४२९ उमेदवारांना पहिल्या टप्प्यात नियुक्ती केली आहे.

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अतिशय श्रमाने अभ्यास केला आणि एमपीएसची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, नियुक्तीसाठी तीन ते चार वर्ष लागत असेल तर ही बाब अतिशय चिंतनीय आहे. हे अन्यायग्रस्त विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यांनी कैफियत मांडली. लोकप्रतिनिधी म्हणून मी कर्तव्य बजावले. या सर्व विद्यार्थ्याना २० ऑक्टोंबर रोजी नियुक्ती मिळाली, याचे समाधान आहे.

- बच्चू कडू, आमदार तथा राज्यमंत्री

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरीBacchu Kaduबच्चू कडू