शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

प्रतीक्षा संपली, अखेर तीन वर्षानंतर एमपीएससीच्या ४२९ अभियंत्यांची नियुक्ती

By गणेश वासनिक | Updated: October 21, 2023 16:54 IST

राज्याच्या जलसंपदा विभागाला उशीरा आली जाग, २०१९ मध्ये झाली होती परीक्षा

चांदूर बाजार (अमरावती) : राज्याच्या जलसंपदा विभागाने गत तीन वर्षांपूर्वी एमपीएससीमार्फत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, तीन वर्षाच्या कालावधी होऊनही या अभियंत्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. परिणामी आमदार बच्चू कडू यांनी जलसंपदा मंत्रालयात गाठून पत्रव्यवहार केला. त्यांच्या स्टाईने ‘प्रहार’ देखील केला. आंदोलनाची धमकी दिली. त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात ४२९ उत्तीर्ण विद्यार्थ्याची अभियंतापदी नियुक्ती केली आहे.

गेल्या तीन वर्षापासून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही ४२९ विद्यार्थ्यांना नियुक्त पत्र मिळाले नव्हते. या विद्यार्थ्याना भविष्य अधांतरी असल्याची भावना निर्माण झाली होती. शासन-प्रशासन स्तरावर या परीक्षार्थींनी पत्र व्यवहार केला. पण ‘मंत्रालयाचे काम, वर्षांनुवर्षे थांब’ असे चालत असल्याचा अनुभव या विद्यार्थ्याना आला. दरम्यान काही विद्यार्थी आत्महत्येचा विचार करीत होते. काहींचे लग्न जुळत नव्हते. हे विद्यार्थी फार अडचणीत होते.

दरम्यान गत काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यानी आमदार बच्चू कडू यांची भेट घेवून आपबीती कथन केली. तसेच त्यांना नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर आ. कडू यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जलसंपदा मंत्रालय गाठले आणि अभियंतापदी नियुक्ती करण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिला. प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आमदार कडू यांनी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषणाची नोटीस देखील दिली होती. अखेर २० ऑक्टोबर २०२३ रोजी जलसंपदा विभागाने शासन निर्णय जारी करीत ४९५ पात्र उमेदवारापैकी ४२९ उमेदवारांना पहिल्या टप्प्यात नियुक्ती केली आहे.

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अतिशय श्रमाने अभ्यास केला आणि एमपीएसची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, नियुक्तीसाठी तीन ते चार वर्ष लागत असेल तर ही बाब अतिशय चिंतनीय आहे. हे अन्यायग्रस्त विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यांनी कैफियत मांडली. लोकप्रतिनिधी म्हणून मी कर्तव्य बजावले. या सर्व विद्यार्थ्याना २० ऑक्टोंबर रोजी नियुक्ती मिळाली, याचे समाधान आहे.

- बच्चू कडू, आमदार तथा राज्यमंत्री

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरीBacchu Kaduबच्चू कडू