शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अखेर राज्यात व्याघ्र प्रगणना प्रारंभ, देशात वाघांची आकडेवारी लवकरच होणार जाहीर

By गणेश वासनिक | Updated: November 3, 2022 18:25 IST

ठाणे जिल्हा वगळला : महाराष्ट्रामुळे थांबली वाघांची आकडेवारी

अमरावती : केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे देशभरात मार्च महिन्यात व्याघ्र प्रगणना करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात व्याघ्र प्रगणनेत चूका झाल्याने सीलच्या निर्देशानुसार अखेर आजपासून व्याघ्र प्रगणनेला सुरुवात झालेली असून या प्रगणनेतुन हा तुर्तास ठाणे जिल्हा वगळण्यात आलेला आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार तीन वर्षानंतर भारतात व्याघ्र प्रगणना कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता, त्यानुसार देशभरातील ३९ राज्यात वाघांची मोजणी करण्यात आली. देशभरात ऑनलाईन पद्धतीने वनरक्षकांनी प्रगणना सहा दिवस पार पाडली. महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी मध्ये महिला वनरक्षकास वाघाने ठार केल्याने प्रगणना खंडीत झालेली होती.

राज्यातील बिटांमध्ये प्रगणना झालेली होती. परंतु संपूर्ण राज्यातील डेटा प्राधिकरणाने गोळा केला असताना चुकीचा डेटा असल्याने राज्याच्या वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले आणि महाराष्ट्राला नव्याने व्याघ्र प्रगणना करणे बाबत सूचना दिल्या होत्या. मध्यंतरी पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रगणना करण्यास अडकाठी आल्याने अखेर १ ते ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत व्याघ्र प्रगणना महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली आहे.ठाणे जिल्हा वगळला

१ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या व्याघ्र प्रगणनेत ठाणे जिल्ह्या वगळण्यात आलेला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी सदर जिल्ह्यात दलदल असल्याने यावेळी प्रगणना करणे शक्य नसल्याने ठाणे जिल्हा वगळलेला आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रगणना सुरु झालेली आहे.सुरक्षेची काळजी घ्या

ताडोबामध्ये वाघाने हल्ला केल्यानंतर महाराष्ट्रात मार्चच्या महिन्यात व्याघ्र प्रगणना घेणे बाबत वनरक्षकांचा सुर होता. परंतु व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उगारताच महाराष्ट्र वनविभागाने अखरे व्याघ्र प्रगणना हाती घेतली आहे. ६ नोव्हेंबर पर्यंत व्याघ्र प्रगणना केली जाणार आहे मात्र, नियंत्रक अधिकाऱ्याने स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आपले स्तरावर व्याघ्र प्रगणनेचा निर्णय घेण्याच्या सूचना प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांनी दिलेल्या आहे. असे असले तरी वनरक्षक व्याघ्र प्रगणना करीत आहे. महाराष्ट्राचा डेटा गेल्यानंतर देशभरातील वाघांची आकडेवारी समोर येईल.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग