शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

माल वाहतूकदारांचा संप मिटला अन् आता भाजीपाल्याचे दर दामदुप्पट करून गेला!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 3, 2024 19:05 IST

भाजीबाजारात ४८ तासांपासून थांबली अन्य जिल्ह्यांसह परराज्यातील आवक

गजानन मोहोड, अमरावती: माल वाहतूकदारांचा संप आता मिटला असला तरी ४८ तासांपासून येथील भाजीमार्केटमध्ये अन्य जिल्ह्यासह परराज्यातील भाज्यांची आवक थांबलेली आहे. या दरम्यान स्थानिक भाजीपाल्यावरच जोर असल्याने ठोक बाजारात दर कडाडले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात तर त्याच्या दामदुप्पट भावाने मंगळवारपासून विक्री होत आहे.

बाजार समितीच्या येथील भाजीमार्केटमध्ये मंगळवारी अन्य जिल्ह्यांसह परराज्यातून आवक झालेली नाही. मंगळवारी रात्री जळगाव येथून बटाटे व कांद्याचे चार ट्रक आलेले आहेत. मात्र, मध्य प्रदेशातून मटर व राजस्थानमधून गाजर याची आवक झालेली नाही. त्यामुळे बटाटे, लसूण व अद्रक चांगलेच कडाडले आहेत.

बुधवारी, टोमॅटो, लसन, अद्रक, कोबी, पत्ता कोबी, गवार, चवळी, ढेमसे, सिमला मिरची, कोहळे, भेंडी, हिरवा वाटाणा व अन्य भाज्यांचे ४० ते ८० रुपये किलोच्या दरम्यान दर होते. दारावर विक्री होणाऱ्या गाड्यांवर त्यापेक्षा अधिक भावाने भाजीपाला विकला गेला. दरम्यान, आता संप मिटला असला तरी गुरुवारी भाजीपाल्याचे लिलाव होत नसल्याने दर चढेच राहणार आहेत व शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे एकंदर चित्र आहे.

टॅग्स :vegetableभाज्या