शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माल वाहतूकदारांचा संप मिटला अन् आता भाजीपाल्याचे दर दामदुप्पट करून गेला!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 3, 2024 19:05 IST

भाजीबाजारात ४८ तासांपासून थांबली अन्य जिल्ह्यांसह परराज्यातील आवक

गजानन मोहोड, अमरावती: माल वाहतूकदारांचा संप आता मिटला असला तरी ४८ तासांपासून येथील भाजीमार्केटमध्ये अन्य जिल्ह्यासह परराज्यातील भाज्यांची आवक थांबलेली आहे. या दरम्यान स्थानिक भाजीपाल्यावरच जोर असल्याने ठोक बाजारात दर कडाडले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात तर त्याच्या दामदुप्पट भावाने मंगळवारपासून विक्री होत आहे.

बाजार समितीच्या येथील भाजीमार्केटमध्ये मंगळवारी अन्य जिल्ह्यांसह परराज्यातून आवक झालेली नाही. मंगळवारी रात्री जळगाव येथून बटाटे व कांद्याचे चार ट्रक आलेले आहेत. मात्र, मध्य प्रदेशातून मटर व राजस्थानमधून गाजर याची आवक झालेली नाही. त्यामुळे बटाटे, लसूण व अद्रक चांगलेच कडाडले आहेत.

बुधवारी, टोमॅटो, लसन, अद्रक, कोबी, पत्ता कोबी, गवार, चवळी, ढेमसे, सिमला मिरची, कोहळे, भेंडी, हिरवा वाटाणा व अन्य भाज्यांचे ४० ते ८० रुपये किलोच्या दरम्यान दर होते. दारावर विक्री होणाऱ्या गाड्यांवर त्यापेक्षा अधिक भावाने भाजीपाला विकला गेला. दरम्यान, आता संप मिटला असला तरी गुरुवारी भाजीपाल्याचे लिलाव होत नसल्याने दर चढेच राहणार आहेत व शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे एकंदर चित्र आहे.

टॅग्स :vegetableभाज्या