शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात

By गणेश वासनिक | Updated: September 5, 2025 14:33 IST

Amravati : मानव-वन्यजीव संघर्ष वाढतोय; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक स्तरावर वाघांच्या संख्येत भारत अव्वलस्थानी असला, तरी वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. सन २०२० ते २०२४ या कालावधीत देशभरात वाघांच्या हल्ल्यात तब्बल ३७८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात २१८ मृत्यू झाले आहेत. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मृत्यूची आकडेवारी सर्वाधिक आहे. तर मेळघाटात गेल्या तीन वर्षात सहा जणांचे बळी गेले आहेत.

राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री, असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. तर, ४८ अभयारण्ये असून, ४ संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून, नजीकच्या राखीव जंगलाच्या दिशेने त्यांनी मुक्काम हलविल्याने मानव-वन्यजीव संघर्ष होत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

वाघांचे मृत्यूही वाढले

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या मृत्यूची संख्याही वाढलेली आहे. विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यू होत आहे, ज्यात नैसर्गिक मृत्यू, दोन वाघांमधील संघर्ष आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे अनैसर्गिक मृत्यू, शिकार, अपघात, विद्युतधक्का आदींचा समावेश आहे. 

मानव-वन्यजीव संघर्ष या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहेत. मानवी वस्तीजवळ फिरणाऱ्या वाघांवर लक्ष ठेवणे, त्यांना पुन्हा जंगलात सोडणे आणि लोकांना यासंदर्भात जागरूक करणे, ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे.आदर्श रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

गत पाच वर्षांत वाघांच्या मृत्यूची आकडेवारी (स्रोत : राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण)२०२० - १०६२०२१ - १२७२०२२ - १२१२०२३ - १७८२०२४ - १२४जानेवारी-एप्रिल २०२५ : ६२ (यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक २० मृत्यू नोंदवले गेले आहेत.)

देशात वाघांच्या हल्ल्यात ३७८ मानवी मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी सर्वाधिक २१८ मृत्यू महाराष्ट्रात झालेत.वर्ष                  मानवी मृत्यू२०२०                   ५१२०२१                   ५९२०२२                  ११० (यापैकी महाराष्ट्रात ८२)२०२३                  ८५२०२४                  ७३

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ