शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजकीयदृष्ट्या ‘वादग्रस्त’ ठरलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सेवेत

By गणेश वासनिक | Updated: January 5, 2023 22:05 IST

शासन निर्णय जारी; जिल्हाधिकारी अध्यक्ष, नवीन गावांचा हाेणार समावेश

गणेश वासनिक, अमरावती: भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीमुळे राजकीय ‘वादग्रस्त’ ठरलेली जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडीने बंद केली आणि या योजनेची खुली चौकशी लावली होती. मात्र पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना नव्या रूपात सुरू करून मान्यता प्रदान केली आहे. जिल्हाधिकारी हे जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष असतील, असा शासन निर्णय ३ जानेवारी २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

सन २०१५ ते २०१९ पर्यंत युती सरकारने जलयुक्त योजना सुरू केलेली होती. या योजनेतून राज्यात २२ हजार ५९३ गावांचा समावेश करण्यात आलेला होता. यामध्ये ६३२८९६ कामे करण्यात आली तर २०५४४ गावे जलयुक्त झाल्याचा दावा योजनेतून करण्यात आला. जवळपास २७ लक्ष टीसीएम पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता तसेच ३१ लक्ष हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्यात.

इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय निर्माण झाल्यानंतर या योजनेमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीमुळे महाविकास आघाडी सरकारचे या योजनेची खुली चौकशी केली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यास मान्यता दिली असून राज्यात ही योजना मंगळवार, ३ जानेवारीपासून कार्यरत झालेली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक ३०२ धडकला आहे.

आराखडा / गावनिवड- जलयुक्त शिवार योजनेत नव्याने गावांचा आराखडा तयार करण्यात येणार असून अवर्षण प्रवण तालुक्यातील गावे त्यात घेतली जाणार आहे. एम.आय.एस. पोर्टलवरून नोंद घेतली जाईल. सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष असतील.

जिल्हास्तरीय समिती- जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य उपवनसंरक्षक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यकारी अभियंता वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधीक्षक कृषी अधिकारी एकूण १२ अधिकारी समितीत राहतील.

टॅग्स :AmravatiअमरावतीJalyukt Shivarजलयुक्त शिवार