शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बच्चू कडू vs रवी राणा; फुसका बार की बॉम्ब, १ नोव्हेंबरला काय घडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 16:44 IST

बच्चू कडू व रवी राणांमधील वाद चिघळला

नागपूर : आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून बच्चू कडू आक्रमक झाले होते. राणा यांनी पुरावे सादर करावे अन्यथा नोटीस पाठवणार, असल्याचे म्हटले होते. तर, आता १ नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. 

बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली. तर, रवी राणांनीही कडूंवर टीकास्त्र सोडले. गुरुवारी रात्री रवी राणांनी एक ट्विट करत बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ''दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे'' असे ट्विट रवी राणा यांनी केले. यानंतर बच्चू कडू काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

टीव्ही ९ शी बोलताना बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. एक तारखेला एक व्हिडीओ जारी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. हा वाद माझ्यापुरता मर्यादीत नाही. पैसे देऊन सरकार स्थापन झाले का? मग मला पैसे कुणी दिले? सर्व आमदारांनी अडचणीत आणणारे हे आरोप आहेत. रवी राणा यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहेत, त्यामुळे हे आरोप कायमचे मिटले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. मी नंगा होईल मला काही फरक पडत नाही, माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल. उद्या राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, ही आरपारची लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत. आम्ही घालून टाकू नांगर, अशा रोखठोक शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणांना सुनावलं आहे.

बावनकुळे म्हणाले..

आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

आरोपांची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

- आ. रवी राणा यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा चिमटाही लोंढे यांनी काढला आहे.

बच्चू कडूंनी रवी राणा व राज्य सरकारलाही १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला असून यासंदर्भात पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं आहे. १ नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा गौप्यस्फोट करेन, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळे आता १ नोव्हेंबरला काय घडते, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणा