शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यंदाच्या मार्च महिन्यात

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2024 23:06 IST

शेतकरी कोमात, निवडणूक जोमात; मुद्द्याला दिली जाते बगल

अमरावती : प्रशासन आणि राजकारण निवडणुकीत व्यस्त असल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या मार्च महिन्यात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. त्यातच अमरावती जिल्ह्यात दोन दशकातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झालेल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे.

यंदाच्या तीन महिन्यात तब्बल ८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी फक्त एक शेतकऱ्याला शासन मदत देण्यात आलेली आहे, यामध्ये ८१ प्रकरणे अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहे. यंदा जानेवारी महिन्यात २४, फेब्रुवारी २८ तर मार्च महिन्यात ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत तीन वेळा वादळासह अवकाळी पावसाने खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. आता आठवडाभरापासून अवकाळीचे सत्र सुरू आहे.

मात्र, यंत्रणेद्वारा अद्याप पंचनामे सुरू करण्यात आलेले नाही. निवडणुकीचा बाऊ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. हातातोंडचा घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडले व यामध्ये धीर खचून शेतकरी मृत्यूला फास ओढत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी