शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

अचलपुरात विदर्भातील पहिले कांदा खरेदी केंद्र सुरू; मुहूर्ताला ५० टन कांदा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 11:13 IST

राज्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नातून प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे.

ठळक मुद्देना. बच्चू कडू यांची संकल्पना

अचलपूर (अमरावती) : मुंबई येथील खासगी कांदा खरेदी संस्था कंपनीतर्फे विदर्भात प्रथमच ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून गांधी पूल अचलपूर येथे प्रहार शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कांदा खरेदी होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. पिकवलेला कांद्याचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील कंपनी अचलपूर येथील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे.

रविवारी मुहूर्तमेढ राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते खानापूर (तट्टे नगर ) येथील शेतकरी शेवाणे या शेतकऱ्याचा मुहूर्तावर कांदा खरेदी करण्यात आला. बाजार भावापेक्षा जास्त दर मिळणार असल्याचे यावेळी बीज ऑन गो कंपनीचे संचालक शौनक भार्गव यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी बच्चू कडू म्हणाले की, नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच अचलपूर येथे खरेदी केंद्र सुरू केले आहे. येथील शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत.

प्रसंगी साईराम अय्यर, यश अग्रवाल, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, वानखडे, महाएफपीसीचे संचालक इंगळे, प्रहार शकती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय तट्टे, सतीश आकोलकर, राहुल तट्टे, सुधीर पवार, तुषार शहाने, गौरव कपिले, अंकुश शेवतकर, ऋषी तट्टे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश अकोलकर यांनी केले. प्रास्ताविक संजय तट्टे यांनी केले. यावेळी ५० टन कांदा खरेदी करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा