शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अचलपुरात विदर्भातील पहिले कांदा खरेदी केंद्र सुरू; मुहूर्ताला ५० टन कांदा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 11:13 IST

राज्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नातून प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे.

ठळक मुद्देना. बच्चू कडू यांची संकल्पना

अचलपूर (अमरावती) : मुंबई येथील खासगी कांदा खरेदी संस्था कंपनीतर्फे विदर्भात प्रथमच ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून गांधी पूल अचलपूर येथे प्रहार शक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कांदा खरेदी होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने प्रथमच विदर्भातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. पिकवलेला कांद्याचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील कंपनी अचलपूर येथील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे.

रविवारी मुहूर्तमेढ राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते खानापूर (तट्टे नगर ) येथील शेतकरी शेवाणे या शेतकऱ्याचा मुहूर्तावर कांदा खरेदी करण्यात आला. बाजार भावापेक्षा जास्त दर मिळणार असल्याचे यावेळी बीज ऑन गो कंपनीचे संचालक शौनक भार्गव यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी बच्चू कडू म्हणाले की, नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच अचलपूर येथे खरेदी केंद्र सुरू केले आहे. येथील शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत.

प्रसंगी साईराम अय्यर, यश अग्रवाल, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, वानखडे, महाएफपीसीचे संचालक इंगळे, प्रहार शकती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय तट्टे, सतीश आकोलकर, राहुल तट्टे, सुधीर पवार, तुषार शहाने, गौरव कपिले, अंकुश शेवतकर, ऋषी तट्टे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतीश अकोलकर यांनी केले. प्रास्ताविक संजय तट्टे यांनी केले. यावेळी ५० टन कांदा खरेदी करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा