शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय भवनातील उपाहारगृहांवर उपेक्षेची धूळ; १६ वर्षांपासून शासनाला वेळ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 13:02 IST

भीमशक्ती करणार प्रत्येक जिल्ह्यात लक्षवेधी आंदोलन

अमरावती : राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन साकारण्यात आले आहे. मात्र, या भवनातील उपहारगृहे गत १६ वर्षांपासून धूळखात पडली आहे. राज्य शासनाने ही उपाहारगृहे सुरू करावी, अन्यथा भीमशक्ती संघटनेतर्फे लक्षवेधी आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे.

राज्यात अनुसूचित जाती व बौद्ध घटकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरिता सन १९८१-८२ पासून विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीकरिता एकूण सात प्रादेशिक उपायुक्त ३५ जिल्ह्यात सहायक आयुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालये कार्यान्वित आहे. तसेच मागासवर्गीय बेरोजगारांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय करण्यासाठी जिल्हास्तरावर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रविदास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जमाती महामंडळ, क्षेत्रीय कार्यालय अभ्यासिका एकाच इमारतीत सुरू करण्याचा क्रांतिकारी शासन निर्णय तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी १ जून २००६ रोजी घेतला.

फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांची कृती व्हावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात भेट देणारे अभ्यागत, लाभार्थी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची गैरसोय होऊ नये, म्हणून उपाहारगृहे बांधण्यात आली आहे. ही उपाहारगृहे सुरू व्हावी, यासाठी २००६ ते २०२२ या १६ वर्षात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला; परंतु, राज्यातील एकाही जिल्ह्यात उपाहारगृहे सुरू करण्यात आली नाहीत, याबाबतचे निवेदन भीमशक्ती संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता अजित पवार, अंबादास दानवे, सचिव सामाजिक न्याय विभाग, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांना पाठविले आहे.

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत उपाहारगृहे सुरू करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय न झाल्यास सर्व जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लक्षवेधी अभिनव आंदोलन केले जाणार आहे. राज्य सरकारला निवेदनातून अवगत केले आहे.

- पंकज मेश्राम, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, भीमशक्ती संघटना

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकारVidarbhaविदर्भ