शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

'ई-केवायसी'मुळे थांबला ८४ हजार शेतकऱ्यांचा लाभ विभागीय आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 13:47 IST

Amravati : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शासनस्तरावरून अनुदान देण्यात येते. यासाठी बँक खाते आधार लिंक व ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात किमान ८४ हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आढावा घेत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे व त्यांना प्रलंबित लाभ देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येते. परंतु, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे ई- केवायसीमुळे प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई- केवायसी लवकर करून नुकसानभरपाई उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी संबंधितांना दिले आहे. शासनाची मदत ही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी बँक खाते क्रमांक, ग्राहक क्रमांक व आधार लिंक करणे आवश्यक असते. या बाबी पूर्ण केल्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

जिल्ह्यात ६३.६१ कोटींची रक्कम पेंडिंगपिकांच्या नुकसानीसाठी ५,३७,४३३ शेतकऱ्यांना शासन अनुदान मंजूर झालेले आहे. यापैकी ४,२९,१५७ शेतकऱ्यांना ४४६.४९ कोटींचा लाभ मिळाला. अद्याप ८४,९७० शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याने ६३.६१ कोटींचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याशिवाय २३,३०६ खात्यांना लाभ नाकारण्यात आलेला आहे.

विभागात २.६४ लाख शेतकरी प्रतीक्षेतविभागातील २,६४,६२१ लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित असल्याने नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली नाही. आतापर्यंत २३,३५,४८४ लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे २१० कोटी जमा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ई-केवायसीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी