शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 06:04 IST

पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

परतवाडा (जि. अमरावती) : पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. परतवाडा ते बैतुल मार्गावरील निंभोरा फाटा येथे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. 

मात्र, रस्त्यावर पडलेल्या सीट कव्हर वरून पोलिसांना शंका आल्याने या अपघाताचा उलगडा झाला. त्यांनी अपघातग्रस्तांना तत्काळ वाहनातून काढून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका गंभीर जखमीला अमरावतीला हलविण्यात आले आहे. 

पांडुरंग रघुनाथ शनवारे (३०, चांदूर बाजार), सतीश सुखदेव शनवारे (३०, बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (२५, खरपी), चारचाकींचा चालक रमेश धुर्वे (३०,  सालेपूर) तसेच दुचाकीस्वार प्रतीक दिनेश मांडवकर (२६), अक्षय सुभाष देशकर (२६, चांदूर बाजार) अशी मृतांची नावे आहेत. संजय गजानन गायन (२२, बोदड) हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास पोलिसांची चमू नियमित गस्तीवर होती. त्यांना सीट कव्हर रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसले. शंका येऊन पोलिसांनी पाहणी केली असता, दुचाकी व कार नाल्यात अपघातग्रस्त अवस्थेत निदर्शनास आली. बहिरम मार्गावर एक हार्डवेअर प्रतिष्ठान आहे. येथून चालकासह पाचजण चारचाकीने निघाले. निंभोरा फाट्याजवळ पोहोचताच त्यांच्या चारचाकीने  दुचाकीला धडक दिली. यामुळे चारचाकी अनियंत्रित होऊन पुलावरून नाल्यात कोसळली.

टॅग्स :Accidentअपघात