शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतक-यांना सवलतीत दरमहा दहा हजार टन धान्य; आत्महत्या रोखण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:45 IST

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला.

अमरावती - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागातील शेतकरी सुमारे १० हजार मेट्रिक टन अन्न-धान्याची उचल दरमहा करीत आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरित करण्यात येत आहे. सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नापिकीमुळे शेतक-यांची अवस्था बिकट झाली आहे. विभागात सर्वाधिक सहा लाख तीन हजार ३३२ लाभार्थी अमरावती जिल्ह्यात आहेत. याच जिल्ह्यातील शेतक-यांकडून ३ हजार १७ मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ३१ हजार १२१ लाभार्थी असून दोन हजार १५५ मे. टन धान्याची येथील शेतकरी उचल करतात. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पाच हजार २१५ शेतक-यांकडून दोन हजार २६ मे. टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख ५२ हजार ९३० शेतकरी एक हजार २६५ मे.टन तर वाशिम जिल्ह्यात दोन लाख ४६ हजार ९५७ शेतकरी एक हजार २३५ मे. टन धान्याची उचल करीत आहे.

विभागात १९ लाख शेतकरी लाभार्थीअमरावती विभागात पाचही जिल्ह्यांतील शेतक-यांची संख्या १९ लाख ३९ हजार ५५५ आहे. या शेतकऱ्यांद्वारा सहा हजार २५० मेट्रीक टन गहू, तर तीन हजार ४४८ मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार ६९८ मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकºयांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.