शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना सवलतीत दरमहा दहा हजार टन धान्य; आत्महत्या रोखण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:45 IST

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला.

अमरावती - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागातील शेतकरी सुमारे १० हजार मेट्रिक टन अन्न-धान्याची उचल दरमहा करीत आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरित करण्यात येत आहे. सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नापिकीमुळे शेतक-यांची अवस्था बिकट झाली आहे. विभागात सर्वाधिक सहा लाख तीन हजार ३३२ लाभार्थी अमरावती जिल्ह्यात आहेत. याच जिल्ह्यातील शेतक-यांकडून ३ हजार १७ मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ३१ हजार १२१ लाभार्थी असून दोन हजार १५५ मे. टन धान्याची येथील शेतकरी उचल करतात. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पाच हजार २१५ शेतक-यांकडून दोन हजार २६ मे. टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख ५२ हजार ९३० शेतकरी एक हजार २६५ मे.टन तर वाशिम जिल्ह्यात दोन लाख ४६ हजार ९५७ शेतकरी एक हजार २३५ मे. टन धान्याची उचल करीत आहे.

विभागात १९ लाख शेतकरी लाभार्थीअमरावती विभागात पाचही जिल्ह्यांतील शेतक-यांची संख्या १९ लाख ३९ हजार ५५५ आहे. या शेतकऱ्यांद्वारा सहा हजार २५० मेट्रीक टन गहू, तर तीन हजार ४४८ मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार ६९८ मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकºयांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.