शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना सवलतीत दरमहा दहा हजार टन धान्य; आत्महत्या रोखण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:45 IST

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला.

अमरावती - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागातील शेतकरी सुमारे १० हजार मेट्रिक टन अन्न-धान्याची उचल दरमहा करीत आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरित करण्यात येत आहे. सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नापिकीमुळे शेतक-यांची अवस्था बिकट झाली आहे. विभागात सर्वाधिक सहा लाख तीन हजार ३३२ लाभार्थी अमरावती जिल्ह्यात आहेत. याच जिल्ह्यातील शेतक-यांकडून ३ हजार १७ मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ३१ हजार १२१ लाभार्थी असून दोन हजार १५५ मे. टन धान्याची येथील शेतकरी उचल करतात. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पाच हजार २१५ शेतक-यांकडून दोन हजार २६ मे. टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख ५२ हजार ९३० शेतकरी एक हजार २६५ मे.टन तर वाशिम जिल्ह्यात दोन लाख ४६ हजार ९५७ शेतकरी एक हजार २३५ मे. टन धान्याची उचल करीत आहे.

विभागात १९ लाख शेतकरी लाभार्थीअमरावती विभागात पाचही जिल्ह्यांतील शेतक-यांची संख्या १९ लाख ३९ हजार ५५५ आहे. या शेतकऱ्यांद्वारा सहा हजार २५० मेट्रीक टन गहू, तर तीन हजार ४४८ मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार ६९८ मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकºयांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.