शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

ZP पदभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षण; सरळ सेवेच्या पद भरतीची मिळणार संधी

By जितेंद्र दखने | Updated: December 6, 2022 18:03 IST

या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता सुगीचे दिवस

अमरावती : राज्यात जिल्हा परिषदेच्या गट क आणि गट प्रवर्गाची पदभरतीसाठी येत्या जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित पदभरती करताना ग्रामपंचायतीमध्ये दहा वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के आरक्षण देऊन पद भरती करावी असे निर्देश राज्याचे अववर सचिव विजय चांदेकर यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत १ डिसेंबर रोजी मिनीमंत्रालयात लेखी आदेश धडकले आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय दहा वर्षे सलग पूर्ण वेळ सेवा केली असेल असा पंचायत कर्मचारी जिल्हा सेवेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कोणत्याही पदावरील नियुक्तीसाठी पात्र असेल. त्याची नियुक्ती थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जेष्ठतेच्या आधारे संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरावयाची पदेही नामनिर्देशनाने सरळसेवेने पदभरती करताना जिल्हा परिषदेची संबंधी संवर्गात रिक्त घोषित केलेल्या एकूण पदाच्या ९० टक्के पदे जाहिरातीद्वारे व १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून पद भरती करणे गरजेचे आहे.

राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेतील गट क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च महिन्यात २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु संबंधित भरती रद्द करण्यात आली. आता जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच वित्त विभागाने ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंधत अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागातील ८० टक्के मर्यादेपर्यत रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने १४ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेतील गट क मधील सर्व संवर्गाची वाहनचालक व गट ड वगळून रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्याबाबत सुधारित कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.

नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत कार्यवाही डिसेंबर २०२२ अखेर पर्यतच्या रिक्त होणारे पदे विचारात घेवून त्याअनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून १० टक्के कोट्यातून ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आदी पदे भरण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायत कर्मचारी व अनुकंपा भरती व भरती प्रक्रिया होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे पदरिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप वाढलेला आहे. सदरहू भरती प्रक्रिया मुळे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यावर जो ताण पडलेला आहे तो कमी होईल.

- पंकज गुल्हाने, जिल्हाध्यक्ष जि.प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना अमरावतीराज्याच्या ग्रामविकास विभागाने झेडपी नोकरभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून १० टक्के पदे भरण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र २०१४ व त्यानंतर २०१९ च्या नोकर भरतीनंतर आता पदभरती होईल.ही पदभरती दरवर्षी रिक्त पदानुसार घ्यावी.

- निळकंठ ढोके, जिल्हा सचिव ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ

टॅग्स :jobनोकरीgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषदAmravatiअमरावती