शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासाठी १० तास ठिय्या

By admin | Updated: October 6, 2016 00:33 IST

आदिवासी मुला- मुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा, यासाठी बुधवारी येथील अपर आयुक्त कार्यालयावर शेकडो विद्यार्थ्यांनी १० तास ठिय्या आंदोलन केले.

आयुक्तांची मध्यस्थी : शुक्रवारी वाढीव क्षमतेला मान्यतेचे संकेतअमरावती : आदिवासी मुला- मुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा, यासाठी बुधवारी येथील अपर आयुक्त कार्यालयावर शेकडो विद्यार्थ्यांनी १० तास ठिय्या आंदोलन केले. अखेर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन तूर्तास मागे घेतले. मात्र या आंदोलनाने काही काळ अधिकाऱ्याची भंबेरी उडाली, हे विशेष.आयुक्त जाधव हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले असता आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी अचानक पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल आयुक्तांना घ्यावी लागली. २८ सप्टेंबर रोजी आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन केले होते, ही बाब आयुक्त जाधव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र वसतिगृहात वाढीव क्षमता प्रवेशासाठी राज्य शासनाची मंजुरी आवश्यक असल्याची माहिती जाधव यांनी समजावून सांगितली. वाढीव प्रवेश क्षमता हा प्रश्न संपूर्ण राज्यभराचा प्रश्न असून २० हजार वाढीव क्षमतेचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ७ आॅक्टोंबर रोजी मंत्रालयात यासंदर्भात बैठक होऊ घातली असून यात सकारात्मक निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काही अपर आयुक्त कार्यालयातंर्गत रिक्त जागेचा आढावा घेऊन त्या अमरावतीला वळती केल्या जातील. किमान १०० ते १२५ जागेचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल, असे आयुक्त जाधव यांनी सांगितले. कोणताही आदिवासी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी हमी त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर शुक्रवारी विद्यार्थी प्रतिनिधींना मंत्रालयात बैठकीत येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी अपर आयुक्त गिरीश सरोदे, सहायक अपर आयुक्त नितीन तायडे, जिल्हा परिषद सदस्य हिरालाल मावस्कर, राजेश तोटे, उपायुक्त लेखा किशोर गुल्हाने, गणेश उघडे, संतोष पवार, अनिल सुरजुसे, सुरेश मुकाडे, रवि पवार, प्रवीण पोतरे आदी उपस्थित होते.आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी हक्क मागतो आहे ही आनंदाची बाब आहे. वसतिगृहात प्रवेश देण्याचा प्रश्न हा मंत्रालयस्तरावरील आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होवून विद्यार्थ्यांचे भले होईल.- राजीव जाधव, आयुक्त, आदिवासी विकास विभाग.