शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था शाळा ‘ओपनिंग’साठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत शिकवणीसाठी पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा सूरही पालकांमध्ये उमटू लागला आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये संभ्रम : २३ पासून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोराेना नियमावलींचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावर मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र, कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रम कायम असल्याचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंता त्यांना सतावत आहे. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे पाठविल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त कोविड-१९ नियमावलींचे पालन होणे अनिवार्य केले आहे. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत शिकवणीसाठी पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा सूरही पालकांमध्ये उमटू लागला आहे. शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाईझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाईझ केले जातील, असे ज्ञानमाता हायस्कूलचे कार्यालय अधीक्षक रवि शर्मा यांनी सांगितले.

अशा आहेत शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाशाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरणबाधित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेशसर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान एचआरसीटी तपासणीशाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे 

विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश मिळणार आहे. शाळेत ५० टक्के, तर घरी ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. नववी ते बारावीपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. मुख्याध्यापकांना पत्राद्धारे शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांचे आरोग्य जाेपासणे, स्वच्छता आदींबाबत अवगत केले आहे.- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, अमरावती.