शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था शाळा ‘ओपनिंग’साठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत शिकवणीसाठी पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा सूरही पालकांमध्ये उमटू लागला आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये संभ्रम : २३ पासून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोराेना नियमावलींचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावर मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र, कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रम कायम असल्याचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंता त्यांना सतावत आहे. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे पाठविल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त कोविड-१९ नियमावलींचे पालन होणे अनिवार्य केले आहे. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत शिकवणीसाठी पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा सूरही पालकांमध्ये उमटू लागला आहे. शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाईझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाईझ केले जातील, असे ज्ञानमाता हायस्कूलचे कार्यालय अधीक्षक रवि शर्मा यांनी सांगितले.

अशा आहेत शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाशाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरणबाधित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेशसर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान एचआरसीटी तपासणीशाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे 

विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश मिळणार आहे. शाळेत ५० टक्के, तर घरी ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. नववी ते बारावीपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. मुख्याध्यापकांना पत्राद्धारे शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांचे आरोग्य जाेपासणे, स्वच्छता आदींबाबत अवगत केले आहे.- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, अमरावती.