शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये रेल्वेला टाटा सुमो धडकून भीषण अपघात, सात प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:26 IST

संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

अमरावती - संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मूर्तिजापूर ते अचलपूर अशी फेरी करणारी इंग्रजकालीन डब्यांची शकुंतला रेल्वे गाडी बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास परतीच्या प्रवासात दर्यापूरहून मूर्तिजापूरकडे धावत होती. गायवाडी येथील गेटसमोर अचानक एमएच ३० पी १३०२ क्रमांकाची टाटा सुमो रेल्वे गाडी आली. शकुंतलेने या वाहनाला तब्बल पाचशे मीटर ढकलत नेले. यानंतर ही रेल्वे गाडी थांबली. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथून लग्न समारंभातून टाटा सुमोतील वºहाडी मंडळी कळाशीकडे येत होती. गायवाडी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शकुंतलेच्या चालकांनी हॉर्न देऊनसुद्धा टाटा सुमोचालकाचे लक्ष नव्हते. त्यामुळे बसलेल्या धडकेत वाहनातील गोपाळराव देवतळे, ज्ञानेश्वरराव बरवट, राजू रामकृष्ण राणे, चंद्रशेखर गावंडे, राजू श्रीरंग राणे, चालक संतोष साबळे व समर्थ विकास राणे (सर्व रा. कळाशी) हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. साडेचार वाजता शकुंतला रेल्वे मूर्तिजापूरकडे रवाना झाली. सदर घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती