शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गतवर्षीपेक्षा यंदा टँकर घटले; विहीर अधिग्रहण वाढले

By जितेंद्र दखने | Updated: May 15, 2023 18:03 IST

Amravati News जिल्ह्यात मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या ७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

जितेंद्र दखनेअमरावती: जिल्ह्यात मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या ७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १५ मेपर्यंत २७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा मात्र हा आकडा केवळ ७ वर आहे. तर विहीर अधिग्रहणाची गावे गतवर्षीपेक्षा यंदा वाढली आहेत.

यंदा पाणीटंचाईची फारशी तीव्रता जाणवणार नाही, असा कयास होता; मात्र तो फोल ठरत आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, सहा गावांत, तर चांदू रेल्वे तालुक्यातील एका गावात टँकर लागले आहेत. तर ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, सर्वाधिक टंचाई चिखलदरा तालुक्यात जाणवत असून आतापासूनच ग्रामस्थांना गावाबाहेरून, वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. येणाऱ्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अनेक गावांत हातपंप बंद पडले असून, ते दुरुस्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मोजक्या कर्मचाऱ्यांवरच ही कामे करावी लागत आहेत. चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक हातपंप बंद आहेत. यंदा उशिरा का होईना मात्र टंचाई आराखडा तयार केला. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ कामे केली जात आहेत.ही आहेत टँकरची गावेचिखलदरा : खोंगडा, मोथा, आकी, घोंगडा, रायपूर, सोमवारखेडा. चांदूर रेल्वे : सावंगी मग्रापूर याशिवाय या तालुक्यामध्ये अधिग्रहित झाल्या विहिरी. अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चिखलदरा, तिवसा, चांदूर रेल्वे, अचलपूर, वरूड, मोर्शी. धारणी, या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या ७ गावांना टँकरने, तर ५५ गावांत पाणीपुरवठ्याकरिता विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. यामाध्यमातून टंचाईचे निवारण केले जात आहे. याशिवाय काही ठिकाणी टंचाईची कामे केली जात आहेत.संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग. जि.प.

टॅग्स :water shortageपाणीकपात