शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा यंदा टँकर घटले; विहीर अधिग्रहण वाढले

By जितेंद्र दखने | Updated: May 15, 2023 18:03 IST

Amravati News जिल्ह्यात मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या ७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

जितेंद्र दखनेअमरावती: जिल्ह्यात मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या ७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १५ मेपर्यंत २७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा मात्र हा आकडा केवळ ७ वर आहे. तर विहीर अधिग्रहणाची गावे गतवर्षीपेक्षा यंदा वाढली आहेत.

यंदा पाणीटंचाईची फारशी तीव्रता जाणवणार नाही, असा कयास होता; मात्र तो फोल ठरत आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, सहा गावांत, तर चांदू रेल्वे तालुक्यातील एका गावात टँकर लागले आहेत. तर ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, सर्वाधिक टंचाई चिखलदरा तालुक्यात जाणवत असून आतापासूनच ग्रामस्थांना गावाबाहेरून, वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. येणाऱ्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अनेक गावांत हातपंप बंद पडले असून, ते दुरुस्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मोजक्या कर्मचाऱ्यांवरच ही कामे करावी लागत आहेत. चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक हातपंप बंद आहेत. यंदा उशिरा का होईना मात्र टंचाई आराखडा तयार केला. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ कामे केली जात आहेत.ही आहेत टँकरची गावेचिखलदरा : खोंगडा, मोथा, आकी, घोंगडा, रायपूर, सोमवारखेडा. चांदूर रेल्वे : सावंगी मग्रापूर याशिवाय या तालुक्यामध्ये अधिग्रहित झाल्या विहिरी. अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चिखलदरा, तिवसा, चांदूर रेल्वे, अचलपूर, वरूड, मोर्शी. धारणी, या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या ७ गावांना टँकरने, तर ५५ गावांत पाणीपुरवठ्याकरिता विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. यामाध्यमातून टंचाईचे निवारण केले जात आहे. याशिवाय काही ठिकाणी टंचाईची कामे केली जात आहेत.संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग. जि.प.

टॅग्स :water shortageपाणीकपात