शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

नियमित घेऊन वाफ, कोरोनावर करू मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:10 AM

अमरावती : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत ...

अमरावती : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात येत असून, सर्वांनी तो यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी केले.

साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदी बाबींचे पालन नागरिकांकडून पालन होणे आवश्यक आहे. या विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सूचनांनुसार जिल्ह्यात स्टीम सप्ताह राबविण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेत बैठकीत झाला. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून गावोगाव चला वाफ घेऊ या, कोरोनाला हरवूया, या सप्ताहाची अंमलबजावणी होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार, प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मोहिमेबाबत सूचना देण्यात आली आहे. सोमवारपासून गावोगाव हे अभियान राबविण्यात येईल, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले. कोरोना विषाणूला हरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व कोरोनावरील अनुभव व अभ्यासानंतर असे निदर्शनास आले की, कोरोना विषाणूला पूर्णपणे हरविण्यासाठी या लढाईत सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्येक घरातून त्याचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न "स्टीम सप्ताह" राबवून आपल्याला करायचा आहे. मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार, व्यायाम, सुसंगत जीवनशैलीचा अवलंब यात वाफ घेणे ही कृतीही समाविष्ट आहे, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.

वाफ घेण्यासारखी बाब आपल्याला तशी परिचित आहे. सध्याच्या काळात तिचे महत्व मोठे आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तिचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी उपयोग होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येकाने मी कोरोनाला हरविणारच हा निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

बॉक्स १

अशी घ्या वाफ

वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी गोळया, झिंक गोळ्या व मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेण्याबाबत आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावयाची आहे. आपल्या नाकाव्दारे वाफेस श्वासाव्दारे शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर सोडण्याची ही प्रक्रिया १० वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेकरिता दोन किंवा ३ मिनिटे लागतात. तसेच साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही उत्तम आहे. आरोग्य विभागातील विविध आरोग्यतज्ञांनी या वाफ घेण्याच्या पद्धतीला कोरोना विषाणूला हद्दपार करण्याकरिता अत्यंत उपयोगी प्रक्रिया पडू शकते, असा विश्वास व्यक्त केलेला आहे. जर दररोज तिन वेळा वाफ घेतली तर कोरोना संसर्गावर नियंत्रणाकरिता मदत मिळू शकते. वाफेमुळे कोरोना विषाणूचा नाश होऊ शकतो असे मत व्यक्त केलेले आहे.

यांचेकडे आहे जबाबदारी

ही मोहीम यशस्वी करण्याकरिता आपण जनतेला ही प्रक्रिया अवलंबिण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, विविध विभागातील कर्मचारी गाव पातळीवरील योग प्रशिक्षक, गावकरी, युवापिढी तसेच लोकांमार्फत प्रसार व प्रसिद्धी करण्याबाबतचे आवाहन जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रेवती साबळे, माताबाल संगोपन अधिकारी विनोद करंजेकर, दिलीप च-हाटे तसेच संपूर्ण तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून कार्यवाही होत आहे.