शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

जंगल संरक्षणार्थ शस्त्रे बाहेर काढा!, एपीसीसीएफचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:50 PM

राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे

गणेश वासनिक अमरावती : राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागात आय.एफ.एस. अधिकाºयांना रिव्हॉल्व्हरचे काम काय, असा प्रश्न यादव यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.अनेक वर्षांपासून वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारी अतिक्रमण आणि सागवान तस्करांनी रान माजविले आहे. शस्त्रास्त्र असलेले शिकारी नेहमीच वनाधिका-यांवर हावी होत असल्याने वनविभागातील वनरक्षकांना टप्प्या-टप्प्याने एसएलआर रायफल आणि संवेदनशील क्षेत्रात काम करणाºया वनपालांना पीएसआयपदांच्या धर्तीवर रिव्हॉल्व्हर दिली आहे. प्रादेशिक आणि वन्यजीव विभागातील आरएफओंना सरसकट ९ एमएम रिव्हॉल्व्हर देण्यात आली आहे. मात्र, यातील बहुतांश शस्त्र हे गरज नसताना आणि जंगल संरक्षणात त्याचा कोणताही फायदा नसताना उपवनसंरक्षक आणि सहायक वनसंरक्षक वर्ग- १ च्या वनाधिका-यांना वाटप केले आहे. ही पदे जिल्हा किंवा तालुका पातळीवरचे असल्याने त्यांना जंगल संरक्षणाच्या नावाखाली रिव्हॉल्व्हर देण्यात आली. आयएफएस अधिका-यांनी १०५ च्यावर रिव्हॉल्व्हर स्वत:कडे अडवून ठेवल्या. मात्र, या सर्व रिव्हॉल्व्हर काढून वनपालांना देण्याचे धाडस अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) करावे, अशी मागणी होत आहे.

सरसकट रिव्हॉल्व्हर का नाही?राज्यात वनपालांची संख्या तीन हजार असून, १४०० वनपाल प्रादेशिक व वन्यजीव विभागात वर्तुळ अधिकारी म्हणून कार्य करतात. अशावेळी पीएसआय या समकक्ष पदानुसार त्यांना सरसकट जंगल संरक्षणाकरिता रिव्हॉल्व्हर, तर वनरक्षकांना एसएलआर रायफल देणे गरजेचे आहे. मात्र, अतिसंवेदनशील भागात कर्तव्यावर असलेल्या वनपालांना रिव्हॉल्व्हर दिलेले आहेत. व्याघ्र प्रकल्पात अशी शस्त्रे अद्यापही देण्यात आलेली नाही.

केवळ ७२० रिव्हॉल्व्हरराज्यातील वनविभागाचा डोलारा मोठा असून, वनपाल, वनक्षेत्रपाल यांना आतापर्यंत ७२० एवढ्याच रिव्हॉल्व्हरचा पुरवठा करण्यात आला. यातील १०५ रिव्हॉल्व्हर आयएफएस लॉबीने स्वत:जवळ ठेवल्या आहेत. या रिव्हॉल्व्हर वनपालांना दिल्यास जंगल संरक्षणाकरिता त्याचा उपयोग होईल. कारण आयएफएस अधिका-यांची शस्त्रे ही त्यांच्या बंगल्याच्या कपाटात धूळखात पडली आहे. 

वर्दी नसणा-यांना शस्त्र कशासाठी?वनविभागात क्षेत्रीय अधिका-यांना वर्दी आहे. वर्ग १ च्या अधिकाºयांना वर्दी देण्यात आली नाही. जंगल संरक्षणार्थ महत्त्वाची भूमिका क्षेत्रीय वनाधिकारी बजावतात. त्यांना शस्त्रपुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात जंगल संरक्षणात थेट सहभाग नसणाºया आणि वर्दी नसणा-या आयएफएस वनाधिकाºयांना रिव्हॉल्व्हर कशाकरिता दिल्यात? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) आर. एस. यादव यांनी जंगल संरक्षणार्थ शस्त्र बाहेर काढा धूळखात ठेवू नये, अशी तंबी राज्यातील सर्व मुख्यवनसंरक्षकांना दिली आहे.