शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

कोरोना बळींची संख्या ६०० घ्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST

अमरावती : चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हच्या टक्क्यांमध्ये कमी येत असताना कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूने डोके वर काढले आहे. रविवारी पुन्हा सहा रुग्णांचा मृत्यू ...

अमरावती : चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हच्या टक्क्यांमध्ये कमी येत असताना कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूने डोके वर काढले आहे. रविवारी पुन्हा सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या ५९९ झालेली आहे. याशिवाय ३८३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२,४९७ झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी २,७०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात १४.१३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आली. शनिवारीदेखील १५ टक्के असे प्रमाण होते. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असला तरी मृत्यू संख्येत होत असलेली वाढ मात्र, चिंताजनक आहे. जिल्ह्यात ३४४ दिवसांत ४२,४९७ पॉझिटिव्हची नोंद झाली. म्हणजेच रोज सरासरी १११ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली व फेब्रुवारी महिन्यात ब्लास्ट झाला. या २८ दिवसांत १७ हजारांपर्यंत कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्हा हादरला व जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर त्यामध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आलेली व याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहे. महापालिका क्षेत्रात दंडाच्या कारवाया नियमित होत आहे. त्यामुळे मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. याशिवाय मंगल कार्यालये, हॉटेल्स व होम आयसोलेटेड बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर कारवाया सुरू आहे. याद्वारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

बॉक्स

कोरोनाचे सहा मृत्यू

०००

००००००००००

( तीन ओळी जागा सोडावी, माहिती यायची आहे.)