शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गोड वाणीने होतात व्यक्तिमत्त्वातही बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:36 PM

कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देअमृता गायगोले : विद्यार्थ्यांसाठी उलगडले गूढ

अमरावती : कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.कंटाळवाण्या आणि अल्पपयोगी शिक्षणातून विद्यार्थीप्रिय आणि आयुष्योपयोगी शिक्षणाचा प्रयोग अमरावतीत 'शाश्वत कन्सेप्ट स्कूल'च्या माध्यमातून रूजविणाऱ्या अमृता अतुल गायगोले यांच्या कार्याची दखल आता देशभरात घेतली जाऊ लागली आहे. त्या सांगतात, ज्यावेळी कुणी 'गोड बोलतात, गुड बोलतात' त्यावेळी त्यांच्या मेंदूतील विचारप्रकियादेखील त्याच दिशेने कार्यरत होते. बोलणे ही मनोशारीरिक क्रिया असल्यामुळे सातत्याने संवेदनशील भाषेचा वापर केल्यास अवघे व्यक्तिमत्त्वच तसा आकार घेऊ लागते. हा अफलातून लाभ केवळ विचारपूर्वक बोलण्यामुळे प्राप्त होऊ शकतो.विद्यार्थ्यांनी बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लावल्यास, ते जे बोलतील ते उपयोगी आणि प्रभावी असेल. ते लाभकारकच असेल. विचारांशिवाय व्यक्त केलेले बोल समस्या निर्माण करू शकतात. तमाम विद्यार्थ्यांनी हे समीकरण पक्के लक्षात घ्यावे, त्याचा आवर्जून अंमल करावा, असे आवाहन अमृता यांनी केले.