शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

स्वाभिमानने घेतली भाजपची विकेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पार गोची झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते येत आहेत, ही बाब स्थानिक नेत्यांना माहीत नसावी, याहून हास्यास्पद काही असूच शकत नाही.

अमरावती : प्रस्थापित राजकारणाला धक्का देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रवि राणा यांनी काही दिवसांपूर्वीच राजापेठ पुलाच्या अंडरपासचे उद्घाटन  सामान्य नागरिकांच्या हस्ते करून त्यांनी तो खुला करून दिला. त्यानंतर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनाच राजापेठ उड्डाणपुलाच्या पाहणीसाठी बोलावून आणखी एक गुगली टाकून शहर भाजप पदाधिकाऱ्यांना क्लीन बोल्ड केले. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पार गोची झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते येत आहेत, ही बाब स्थानिक नेत्यांना माहीत नसावी, याहून हास्यास्पद काही असूच शकत नाही. अमरावतीचे महापौर म्हणतात, माजी मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मला नव्हती. इतर नेत्यांनाही आपल्या नेत्याच्या या ‘सस्पेंस’ दौऱ्याबाबत कल्पना नसणे एकूणच भाजपसाठी चिंतनाचा विषय आहे. राजापेठ येथील भुयारी मार्गाचे लोकार्पण युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवि राणा यांनी आधीच उरकून टाकले. नंतर भाजपवाल्यांना जाग आली. म्हणे, आमच्या नेत्याला बोलावून या मार्गाचे पुन्हा लोकार्पण करण्यात येईल. झाले मात्र उलटेच. नेते आले; पण तेही रवि राणा यांच्या आमंत्रणावरून आणि फडणविसांची अमरावतीतील कालची एन्ट्री भाजपवाल्यांनाही माहीत नसावी, हे तर नवलच! काही दिवसांपूर्वी रवि राणा यांनी याच मार्गाचे लोकार्पण केले होते. त्यावेळी महापौर चेतन गावंडे यांनी पत्रकारांशी बोलताना या मार्गाचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द फडणवीसच राणा यांच्यासोबत असतील तर स्थानिक भाजपवाल्यांनी करायचे तरी काय, असा सवाल आता कार्यकर्ते आपल्या नेत्यांना विचारू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील राजकीय रसायन जरा अजब आहे. राज्यात खांद्याला खांदा लावून काम करणारे पक्ष स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. भाजपला सदैव साथ देणारा स्वाभिमान पक्षही या जिल्ह्यात भाजपला नकोसा आहे. अर्थात, केंद्रापासून तर राज्यातील नेतृत्वाला या पक्षाशी प्रेम असले तरी स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांना स्वाभिमानची ॲलर्जी आहे. असो, राणा मात्र आपल्या कामात मग्न आहेत, असे म्हणत राणा दाम्पत्याचे समर्थन करायचे, असे मुळीच नाही; पण पक्षश्रेष्ठींना जे आवडतात ते स्थानिक नेत्यांना का आवडत नाहीत, असा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यात पिंगा घालत आहे. कालची घटनाही तशीच आहे. फडणवीस अमरावतीत राणांच्या निमंत्रणावरून येतात, तेही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना न सांगता. यातून एक बाब सिद्ध होते - ती म्हणजे, स्वाभिमानने स्थानिक भाजप नेतृत्वाची विकेट घेतली, तेही कुणाला न सांगता..!

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRavi Ranaरवी राणा