शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वाभिमानने घेतली भाजपची विकेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पार गोची झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते येत आहेत, ही बाब स्थानिक नेत्यांना माहीत नसावी, याहून हास्यास्पद काही असूच शकत नाही.

अमरावती : प्रस्थापित राजकारणाला धक्का देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रवि राणा यांनी काही दिवसांपूर्वीच राजापेठ पुलाच्या अंडरपासचे उद्घाटन  सामान्य नागरिकांच्या हस्ते करून त्यांनी तो खुला करून दिला. त्यानंतर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनाच राजापेठ उड्डाणपुलाच्या पाहणीसाठी बोलावून आणखी एक गुगली टाकून शहर भाजप पदाधिकाऱ्यांना क्लीन बोल्ड केले. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पार गोची झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते येत आहेत, ही बाब स्थानिक नेत्यांना माहीत नसावी, याहून हास्यास्पद काही असूच शकत नाही. अमरावतीचे महापौर म्हणतात, माजी मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मला नव्हती. इतर नेत्यांनाही आपल्या नेत्याच्या या ‘सस्पेंस’ दौऱ्याबाबत कल्पना नसणे एकूणच भाजपसाठी चिंतनाचा विषय आहे. राजापेठ येथील भुयारी मार्गाचे लोकार्पण युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवि राणा यांनी आधीच उरकून टाकले. नंतर भाजपवाल्यांना जाग आली. म्हणे, आमच्या नेत्याला बोलावून या मार्गाचे पुन्हा लोकार्पण करण्यात येईल. झाले मात्र उलटेच. नेते आले; पण तेही रवि राणा यांच्या आमंत्रणावरून आणि फडणविसांची अमरावतीतील कालची एन्ट्री भाजपवाल्यांनाही माहीत नसावी, हे तर नवलच! काही दिवसांपूर्वी रवि राणा यांनी याच मार्गाचे लोकार्पण केले होते. त्यावेळी महापौर चेतन गावंडे यांनी पत्रकारांशी बोलताना या मार्गाचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द फडणवीसच राणा यांच्यासोबत असतील तर स्थानिक भाजपवाल्यांनी करायचे तरी काय, असा सवाल आता कार्यकर्ते आपल्या नेत्यांना विचारू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील राजकीय रसायन जरा अजब आहे. राज्यात खांद्याला खांदा लावून काम करणारे पक्ष स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. भाजपला सदैव साथ देणारा स्वाभिमान पक्षही या जिल्ह्यात भाजपला नकोसा आहे. अर्थात, केंद्रापासून तर राज्यातील नेतृत्वाला या पक्षाशी प्रेम असले तरी स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांना स्वाभिमानची ॲलर्जी आहे. असो, राणा मात्र आपल्या कामात मग्न आहेत, असे म्हणत राणा दाम्पत्याचे समर्थन करायचे, असे मुळीच नाही; पण पक्षश्रेष्ठींना जे आवडतात ते स्थानिक नेत्यांना का आवडत नाहीत, असा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यात पिंगा घालत आहे. कालची घटनाही तशीच आहे. फडणवीस अमरावतीत राणांच्या निमंत्रणावरून येतात, तेही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना न सांगता. यातून एक बाब सिद्ध होते - ती म्हणजे, स्वाभिमानने स्थानिक भाजप नेतृत्वाची विकेट घेतली, तेही कुणाला न सांगता..!

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRavi Ranaरवी राणा