शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘कृषी‘च्या ११ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 13:42 IST

१.८३ कोटींचा लोकवाटा महामंडळाकडे जमा न करणे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दिरंगाईबाबत पश्चिम विदर्भातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी निलंबनाची धडक कारवाई केली.

ठळक मुद्दे‘एमएआयडीसी’च्या १.८३ कोटींचा लोकवाटा शासनजमा न करणे भोवले

गजानन मोहोड

अमरावती : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडीसी) योजनांमधील शेतकऱ्यांचा ५० टक्के सहभाग म्हणजेच १.८३ कोटींचा लोकवाटा महामंडळाकडे जमा न करणे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दिरंगाईबाबत पश्चिम विदर्भातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी निलंबनाची धडक कारवाई केली आहे.

महामंडळाद्वारा पश्चिम विभागात २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत शेतकऱ्यांना ५० टक्के सहभागावर कृषी अवजारे व साहित्याचा पुरवठा करण्यात आला. जानेवारी २०१७ नंतर डीबीटीद्वारे लाभ देण्यापर्यंत ही योजना सुरू होती. यामध्ये शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्र, नॅपसॅक पंप, रोटाव्हेटरसारखी सामग्री व अवजारे डिसेंबर २०१६ पर्यंत देेण्यात आली. काही प्रकरणात २००७ पासून शेतकऱ्यांना लाभ दिल्यानंतर लोकवाटा कृषी विभागाकडे जमा करण्यात आलेला नाही.

पश्चिम विदर्भात शेतकरी हिश्श्याची १,८३,३५,९४२ रुपयांची रक्कम प्रलंबित होती, ही रक्कम काहींनी वसूल केली व शासनजमा केलेली नाही, तर काही अधिकाऱ्यांकडे बहुतेक प्रकरणात लोकवाटा जमा झालाच नसल्याचे सांगण्यात आले. या प्रलंबित रकमेसाठी आतापर्यंत विभागीय कृषी सहसंचालकांद्वारा चार-पाच वेळा पत्र व नोटीस बजावण्यात आल्यात. याकडे दुर्लक्ष करणे ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता चांगलेच भोवले आहे. यापैकी अकोला व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी एका कर्मचाऱ्याने रक्कम जमा केल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांनी सांगितले.

जिल्हानिहाय थकबाकी व निलंबनाचे आदेश

बुलडाणा : प्रलंबित १७,६२,१२३ रकमेपैकी १२,१३,०६४ रुपये शासनजमा नसल्याने एकाला निलंबन करण्यात आले.

अकोला : प्रलंबित ६३,४३,७९२ रकमेपैकी २७,३४,०७७ रुपये शासनजमा नसल्याने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आले.

वाशिम : ६५,२८,२३६ लोकवाट्यामधील ५३,९१,१५७ रुपयांची वसुली बाकी असल्याने तीन कर्मचारी निलंबित केले आहे.

अमरावती : लोकवाट्यामधील १,६१,६३४ रुपये शासनजमा नसल्याने एकाला निलंबित करण्यात आलेले आहे.

यवतमाळ : ३५,४०,१२७ रकमेपैकी १८,३५,५८७ रुपये शासनजमा नसल्याने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

एमएआयडीसीच्या योजनेतील १.८३ कोटींचा लोकवाटा जमा करण्यासाठी संबंधितांना चार ते पाच वेळा पत्रे, नोटीस बजावण्यात आल्यात. दिरंगाई करण्यात आल्याने ११ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकारsuspensionनिलंबन