शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

तीन दिवसांत सर्वेक्षण, महिनाभरात नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:02 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत ...

ठळक मुद्देप्रवीण पोटे-पाटील यांचे आदेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित होते.जिल्ह्यात मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या आठ तालुक्यांत गारपिटीसह पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, केळी, संत्रापिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण ३८४ गावातील सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी, महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांचे आत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, अहवाल करीत असताना बाधित शेतकºयांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळायला हवी, या दृष्टीने अहवाल करावा, असे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.कृषी संजीवनी योजनेंतर्गत ५३२ गावांची निवडजागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या प्रकल्पाविषयी शेतकºयांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. या प्रकल्पांतर्गत समूह तसेच वैयक्तिक प्रकल्पांसाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे ७५ टक्के व ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५३२ गावांची निवड करण्यात आली असून सुमारे ५८ क्लस्टर हे खारपाणपट्ट्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपरोक्त सर्व गावांत पाच टप्प्यांत कामे पूर्णत्वास जाणार आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी शेतकºयांना सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मंजूरसन २०१७-१८ या वर्षाकरिता सुमारे ३० कोटी निधी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचयातींनी रस्ता व नाला बांधणीच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुठलेही काम करताना ते गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होईल याची दक्षता घ्यावी. विकासकामात प्रत्येक पदाधिकाºयांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले.तालुकानिहाय नुकसानमोर्शी तालुक्यात ४० गावांमध्ये २,५०४ हेक्टर, वरूड तालुक्यात ६ गावांमध्ये ५० हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात १५४ गावांमध्ये १७,१०३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात ५७ गावांत ६,३७५ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात १७ गावांत ४३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४,५२५ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ६ गावांमध्ये १६ हेक्टर, तर धारणी तालुक्यात २० गावांमधील ११० हेक्टरमध्ये नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे.