शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

आश्चर्य ! नववीच्या वर्गातील पाच हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

गतवर्षी नववीत ४५८४४ विद्यार्थी पटसंख्या होती. यात २३८३० मुले, तर २२०१४ मुलींची संख्या होती. त्यापैकी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ४०६६३ विद्यार्थी परीक्षेत प्रवेशित होते. नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश केला असताना ५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले तर नाही, अथवा बाहेरगावी तर गेले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरलाच नाही, दहावीच्या पटसंख्येत कमालीची तफावत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पहिली ते नववीपर्यंतच्या  विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. असे असताना जिल्ह्यातील नववी  उत्तीर्ण झालेल्या ५२२१ विद्यार्थ्यांनी दहावीचे परीक्षा अर्ज भरले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे गेले, असा सवाल शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. नववी उत्तीर्ण होऊनही दहावीत प्रवेश किंवा परीक्षा न देणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत.गतवर्षी नववीत ४५८४४ विद्यार्थी पटसंख्या होती. यात २३८३० मुले, तर २२०१४ मुलींची संख्या होती. त्यापैकी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ४०६६३ विद्यार्थी परीक्षेत प्रवेशित होते. नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश केला असताना ५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले तर नाही, अथवा बाहेरगावी तर गेले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र, पटसंख्येवर दर्शवून विद्यार्थ्यांची आकडेवारी फुगवून दाखविली जाते, असे यातून स्पष्ट होते. त्यामुळेच नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीत प्रवेश वा परीक्षा दिली नाही, हे पुढे आले. 

पटसंख्येचा घोळशाळेच्या पटसंख्येवर विद्यार्थी कमी दिसू नये, यासाठी पहिलीपासूनच आकडेवारी फुगवून दर्शविली जाते. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थी संख्या कायम दिसते.काही विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतरही ते पटसंख्येवर कायम असतात. शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असतो.विशेषत: शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्येवर नसताना तो विद्यार्थी प्रवेशित असल्याचा हा प्रकार नित्याचीच बाब झाली आहे.

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर - नववीनंतर पुढे शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही कुटुंबांत आर्थिक चणचण जाणवत असल्याने रोजगाराच्या शोधासाठी विद्यार्थी शिक्षण सोडतात.- काही आई-वडील मुलगी दहाव्या वर्गात पोहोचली की, १५ व्या वर्षीच विवाह करून मोकळे होतात. हा बालविवाह असतानासुद्धा समाजात यासंदर्भात दखल घेतली जात नाही. विशेषत: दुर्गम, आदिवासी भागात असा प्रकार अधिक जाणवतो.- मजूर कुटुंब स्थलांतरित होते. त्यामुळे नववीनंतर दहावीत प्रवेश न घेता    रोजगाराकडे विद्यार्थी वळतात, त्यामुळे  पुढील शिक्षणाला ब्रेक लागतो.

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या