शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यघटनेला अभिप्रेत समाज निर्माण व्हावा, न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2025 21:48 IST

Justice Bhushan Gavai News: राज्यघटनेला अभिप्रेत असा समाज निर्माण व्हावा, तेव्हाच राष्ट्र उभारी घेईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

- गणेश वासनिक अमरावती - देशाची राज्यघटना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेवर आधारित आहे. जात, धर्म, वर्गभेद विसरून सर्वांना समान संधी मिळवून देण्याची ती हमी देते. प्रत्येक व्यक्तीला न्याय व मूलभूत हक्क हे राज्यघटनेमुळे अबाधित आहेत. त्यामुळे समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजे. राज्यघटनेला अभिप्रेत असा समाज निर्माण व्हावा, तेव्हाच राष्ट्र उभारी घेईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी रविवारी येथे व्यक्त केला.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ व्या दीक्षान्त सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. या साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. यावेळी मंचावर राज्यपालांचे सचिव आयएएस प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी आदी उपस्थित होते.

दीक्षान्त सोहळ्यात सुवर्ण पदक, पदवी, आचार्य पदवी, पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, तुमचा प्रवास इथे संपला नाही, तो आता सुरू झाला आहे. निरोगी शरीर आणि निकोप मन निर्माण करा. तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या कुटुंबाचे, विद्यालयाचे, तुमच्या गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी अशा लोकोत्तर महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक जबाबदार नागरिक बना. स्वतःला घडवा. देश आणि समाज नव्याने निर्माण करा, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले. गाडगेबाबांचा आशीर्वाद दादासाहेब गवईंनाही मिळालासंत गाडगेबाबा हे कोणत्याही शाळा, महाविद्यालयात गेले नाहीत. पण, निरक्षर असलेल्या या माणसाचे नाव अमरावती विद्यापीठाला देण्यात आले, ही देशातील पहिली घटना असावी, असे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. गाडगेबाबांचा जीवनसंघर्ष, समर्पण आणि समतेवरील विश्वास आजही प्रेरणादायी आहे. माझ्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे गाडगेबाबांचा सहवास आणि आशीर्वाद माझे वडील रा.सू. उपाख्य दादासाहेब गवईंना मिळालेला आहे. माझे वडील विद्यार्थीदशेत असताना गाडगेबाबा त्यांना प्रवचनाला घेऊन जायचे व त्यांना बाबा प्रवचनाच्या अगोदर भाषण करायला सांगायचे. खरे पाहता माझ्या वडिलांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीच्या पायाभरणीत गाडगेबाबांचे अतिशय मोलाचे योगदान आहे, असे न्यायमूर्ती गवई म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती