शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक रेशनसाठी ३८ लाख ग्राहकांचे आधार लिंक, राज्यातील वितरण व्यवस्थेची स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 16:41 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये व्यवहार पारदर्शी होऊन भ्रष्टाचार निकाली निघावा, यासाठी राज्यातील ५१ हजार ८९६ रेशन दुकानात ‘पीओएस’ (पॉस) मशीन बसविण्यात आल्यात. या प्रक्रियेसाठी ३८ लाख ६८ हजार ६८३ कुटुंब सदस्य आधार लिंक करण्यात आले. याद्वारे सद्यस्थितीत ६६ टक्के रेशन धान्याचा पुरवठा बायोमेट्रिकद्वारे होत आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये व्यवहार पारदर्शी होऊन भ्रष्टाचार निकाली निघावा, यासाठी राज्यातील ५१ हजार ८९६ रेशन दुकानात ‘पीओएस’ (पॉस) मशीन बसविण्यात आल्यात. या प्रक्रियेसाठी ३८ लाख ६८ हजार ६८३ कुटुंब सदस्य आधार लिंक करण्यात आले. याद्वारे सद्यस्थितीत ६६ टक्के रेशन धान्याचा पुरवठा बायोमेट्रिकद्वारे होत आहे.अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन ख-या लाभार्थीना रेशन धान्याचा पुरवठा व्हावा व सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सर्व व्यवहार पारदर्शी व्हावेत अन् भ्रष्टाचाराला चाप बसावा, यासाठी पुरवठा विभागाद्वारा रेशन दुकानात पॉस (पाँइंट आॅफ सेल) मशीन बसविण्यात येत आहेत. सर्व रेशन दुकाने, घाऊक व किरकोळ रेशन परवानाधारक, पुरवठा विभागाची गोदामे गॅस एजन्सीचा डेटा संलग्न करून संगणकीकृत करण्यात आलेला आहे. राज्यात ५२ हजार २२९ पॉस मशीन लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातुलनेत सध्या ५१ हजार ८९६ मशीन बसविण्यात आल्यात. राज्यात १ कोटी ३ लाख ७२ हजार १७६ एकूण ग्राहकसंख्या आहे. त्यातुलनेत सध्या ३८ लाख ६८ हजार ६८८ सदस्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आले आहेत.राज्यात नोव्हेंबर महिन्यासाठी २ लाख ४२ हजार ८५५ मेट्रीक टन धान्याचे आवंटन मंजूर करण्यात आले, यापैकी ६४ टक्के धान्यवाटप हे पॉस मशीनद्वारा करण्यात आले. त्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात ६६ टक्के धान्यवाटप करण्यात आले होते. पुरवठा विभागाद्वारा शिधापत्रिकांचे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाची माहिती यापूर्वी संकलित करण्यात आलेली आहे. याद्वारे रेशन दुकानातील स्टॉक, लाभार्थ्यांनी केलेली धान्याची उचल याविषयीची माहिती पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर आता उपलब्ध केली जाणार आहे.

आणखी वाचा - आता इंटरनेट कनेक्शनसाठीदेखील आधार कार्ड आवश्यक

जिल्हानिहाय लावलेल्या पॉस मशीनराज्यात चंद्रपूर जिल्ह्यात १५२३, कोल्हापूर १५७०, गोंदिया ९९७, वाशिम ७७४, नांदेड १९७७, वर्धा ८४०, सांगली १३४२, भंंडारा ८८४, जालना १२८०, अकोला १०४०, परेल ५६९, परभणी ११८३, उस्मानाबाद १०७९, गडचिरोली ११९५, वडाळा, १०३३, अंधेरी ५३२,औरंगाबाद १७९७, कांदीवली ७०१, नागपूर १९४१, हिंगोली ७९५, सातारा १६२६, बुलडाणा १५३९, ठाणे १,४१९, अमरावती १९२२, नाशिक २५९६, सोलापूर १८६९, धुळे ९८५, जळगाव १९२६, पुणे २६३०, बीड १९६२, ठाणे ५९०, नंदूरबार ९९०, रत्नागिरी ९१५, सिंधुदुर्ग ४३२, रायगड १३५७, अहमदनगर १८९३ व पालघर जिल्ह्यात १०९५ मशीन लावण्यात आल्यात.

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड