शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

उन्हाळ्यात पशुपक्ष्यांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:08 IST

घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणवठे आटले : शरीरातील पाणी कमी झाल्याने आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे.यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा वाढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी, वा अन्य वनचर प्राण्यांवर हवामानातील बदलाचा परिणाम होतोे.पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यात त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशुपक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डिहायड्रेशन होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते आजारी पडतात. विविध उन्हाळी सांसर्गिक आजार जडतात. अशा प्राण्यांवर वेळीच उपचार केले जातात. मात्र, प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचविणे अवघड झाले आहे. डिहायड्रेशनबरोबरच पचनसंस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, स्वसन संस्थेचे आजार पशुपक्ष्यांना होतात. इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यावर पशुपक्षी तहान भागवतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांचे पाणी पातळी घटत चालली आहेत. आणि नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करताना दिसतात. सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या कमालीची कमी झाली आहे. त्यातच नुकतीच पानगळ झालेली झाडे उघडी बोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशुपक्ष्यांना मिळत नाही. सिमेंट डांबरी रस्त्यामुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातही घर व परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे, कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याचे पहायला मिळत आहे.जलपात्र लागावे ठिकठिकाणीकितीही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करू न घेतो. प्राणीही मिळेल तिथे पाणी पितात. परंतु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पक्ष्यांनाही पाणी व निवाºयांचा आसरा देण्यासाठी जलपात्र व घरटी सावलीच्यआ ठिकाणी बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन पक्षिप्रमींकडून करण्यात येत आहे. शहरात वनमाला सामाजिक संघटनेसह इतरही संघटनांनी जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्याचा हा स्तुत्य उपक्रम जिल्हाभर राबविण्याची आज आवश्यकता आहे.पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात पक्ष्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यांची चारा-पाण्याची सुविधा नागरिकांनी करणे गरजेचे आहे.- नीलेश कंचनपुरे,पक्षिप्रेमी, अमरावती