शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

उन्हाळ्यात पशुपक्ष्यांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:08 IST

घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणवठे आटले : शरीरातील पाणी कमी झाल्याने आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे.यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा वाढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी, वा अन्य वनचर प्राण्यांवर हवामानातील बदलाचा परिणाम होतोे.पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यात त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशुपक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डिहायड्रेशन होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते आजारी पडतात. विविध उन्हाळी सांसर्गिक आजार जडतात. अशा प्राण्यांवर वेळीच उपचार केले जातात. मात्र, प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचविणे अवघड झाले आहे. डिहायड्रेशनबरोबरच पचनसंस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, स्वसन संस्थेचे आजार पशुपक्ष्यांना होतात. इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यावर पशुपक्षी तहान भागवतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांचे पाणी पातळी घटत चालली आहेत. आणि नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करताना दिसतात. सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या कमालीची कमी झाली आहे. त्यातच नुकतीच पानगळ झालेली झाडे उघडी बोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशुपक्ष्यांना मिळत नाही. सिमेंट डांबरी रस्त्यामुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातही घर व परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे, कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याचे पहायला मिळत आहे.जलपात्र लागावे ठिकठिकाणीकितीही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करू न घेतो. प्राणीही मिळेल तिथे पाणी पितात. परंतु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पक्ष्यांनाही पाणी व निवाºयांचा आसरा देण्यासाठी जलपात्र व घरटी सावलीच्यआ ठिकाणी बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन पक्षिप्रमींकडून करण्यात येत आहे. शहरात वनमाला सामाजिक संघटनेसह इतरही संघटनांनी जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्याचा हा स्तुत्य उपक्रम जिल्हाभर राबविण्याची आज आवश्यकता आहे.पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात पक्ष्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यांची चारा-पाण्याची सुविधा नागरिकांनी करणे गरजेचे आहे.- नीलेश कंचनपुरे,पक्षिप्रेमी, अमरावती