शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:12 AM

तळेगाव दशासर : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली ...

तळेगाव दशासर : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, आठ वर्षानंतरही ती पूर्णत्वास गेलेली नाही. गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून, इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे.

---------------

मजीप्राने खोदून ठेवले रस्ते

मंगरूळ दस्तगीर : पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे हे गाव त्या खोदकामामुळे भकास झाले आहे. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांंकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. या गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने किरकोळ अपघातदेखील वाढले आहेत.

----------------

फोटो पी २३ कारवाई

पाच व्यापारी प्रतिष्ठानांवर कारवाई

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर निर्बंध असतानादेखील नियम तोडणाऱ्या पाच व्यापारी प्रतिष्ठानांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आदित्य झेरॉक्स (फरशी स्टॉप), सोहित सेल्स (विलासनगर), वेलकम सीट कवर (दसरा मैदान), पुणेरी चहा (रामपुरी कॅम्प), वन्स मोर सलून (पलाश लाइन) या आस्थापनांवर राजापेठ पोलीस व गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या तक्रारीनुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

---------------

बंदी कागदावरच, बोअर सुरूच

वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना, त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केला जात आहेत.

---------------

‘ते’ खुले रोहित्र झाकणबंद करण्याची मागणी

करजगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला लागून आझाद चौकात खुले रोहित्र आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. महावितरणला आणखी प्राणांतिक अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल करजगाववासीयांनी उपस्थित केला आहे.

---------------

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पाणीटंचाई

चिखलदरा : तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ३५ गावातील पाणीटंचाई ‘जैसे थे’ आहे. अनेक गावांत टँकरवारी सुरू झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.