शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून काढावा लागतो जिवघेणा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:01 IST

Amravati : नदीवर पूल नाही, पावसाळ्यात बेलगंगा वाहते दुथडी

मनोहर मुरकुटेलोकमत न्यूज नेटवर्क अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा येथे शिक्षण घेणाऱ्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे दुथडी भरून वाहणाऱ्या बेलगंगा नदीच्या पुरातून मार्ग काढावा लागत आहे. हा प्रकार जिवावर बेतणारा ठरू शकतो. भरपावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होऊन जनजीवन ठप्प होते. या नदीवर पुलाची मागणी कैक वर्षापासून नागरिक करीत आहेत.

चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालय हे या परिसरात एकमेव नामांकित विद्यालय आहे. निमखेड बाजार, हिरापूर, खिराडा, चिंचोना, सावरपाणी, खिरपाणी या गावातील विद्यार्थी येथे येतात. त्यांना चौसाळा ते निमखेड बाजार मार्गाने बेलगंगा नदीपात्रातून वाट काढावी लागते. पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात पुरातूनच ये-जा करावी लागते. गेल्या चार-पाच दिवसांपासून बेलगंगावरील सावरपाणी येथील धरण भरल्याने नदीला पूर आहे. जवळपास या पाण्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.

एकीकडे पूर, दुसरीकडे काटेरी झुडपे"चौसाळा ते निमखेड बाजार मार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गाच्या दोन्ही कडांवरील काट्यांची झुडपे आहेत. नागरिकांना या काटेरी झुडपांचे फटके खातच मार्गक्रमण करावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर विद्यार्थ्यांना त्यातून मार्ग काढून शाळा गाठावी लागते. चौसाळा निमखेड बाजार रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मार्गी लावावा."- विजय तिजारे, निमखेड बाजार

"मी नवीनच रुजू झाल्यामुळे लवकरच प्राथमिकदृष्ट्या काय उपाययोजना करता येतील, त्या मी स्वतः पाहणी करून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे."- तेजस तंबाखे, उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, दर्यापूर 

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळाfloodपूर