शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:30 IST

नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे.

ठळक मुद्देएकविरा माता मंदिरात कीर्तन : तुषार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी फेसबुक व व्हाट्सअ‍ॅपच्या आहारी जाण्याऐवजी सखोल वाचनाचे व्यसन जोपासावे. वाचाल तर वाचाल हा शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला आत्मसात करावा, असे प्रतिपादन सामाजिक कीर्तनकार तुषार सुर्यवंशी यांनी केले.एकवीरा माता मंदिर परिसरात आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाजाला व प्रामुख्याने शेतकरी बांधवांना दिलेली मौल्यवान देणगी आहे. त्या ग्रंथात जन्मापासून मृत्यूपर्यंत करावयाच्या संस्कारांचा खजिना आहे. तो लुटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी युवा पिढी भरकटत चालली आहे. त्यामुळे मूल्यशिक्षण व संस्काराला फार महत्व आलेले आहे. लोकसंख्या अफाट वाढलेली असतांना राष्ट्रसंतांना माणूस द्या मज माणूस द्या, अशी हाक द्यावी लागली. यावरून जनतेने माणूस कोण हे समजून घेण्याची गरज आहे. अंधश्रद्धा तर फोफावत चाललेली आहे. स्वत:ला सुशिक्षित समजणारा समाज बुआ-बाबांच्या मागे लागलेला आहे. दारात आलेला गरजू भिकारी उपाशी पोटी परत पाठविणारे लोक ऐतखाऊ बाबा लोकांना लाखो रुपये देणगी देतांना दिसतात यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. युवा पिढीतील सप्त खंजेरी वादक कीर्तनकार म्हणून तुषार सुर्यवंशी उदयास आले आहेत. कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.