शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

पन्नास ते साठ गुणांचे पेपर सोडवूनही शून्य गुण; विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:40 IST

विद्यार्थ्यांचा मूल्यांकनावर आक्षेप

अमरावती : एम.एस्सी. प्रथम वर्ष सेमिस्टर पॅटर्न हिवाळी २०१९ परीक्षेत गणित विषयात विद्यार्थ्यांना गुण कमी अथवा काहींना शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावरच आक्षेप घेतला आहे. सोमवारी एम.एस्सी.च्या असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक देत प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांची भेट घेत आपबिती कथन करत ठिय्या मांडला. ६० ते ७० गुणांचे पेपर सोडविले असताना शून्य अथवा ५, १० गुण कसे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, विद्याभारती महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागात एम.एस्सी.ला प्रवेशित गणित विषयांच्या विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होता. एनएसयूआयने एम.एस्सी. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. गणित विषयाच्या टोपोलॉजी, अ‍ॅडव्हॉन्स अ‍ॅबस्ट्रॉक पेपरमध्ये मिळालेले गुण फारच कमी आहे. काही विद्यार्थ्यांनी ५० ते ६० गुणांचे प्रश्न सोडविले असताना शून्य गुण कशाच्या आधाराने देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन होत असल्याचा आक्षेप घेतला. स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रियंका उंबरकर या विद्यार्थिनीला अ‍ॅडव्हॉन्स अ‍ॅबस्ट्रॉक पेपरमध्ये केवळ १ गुण मिळाल्याची उत्तरपत्रिका निवेदनासोबत जोडली आहे. हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर होत असताना एम.एस्सी. गणित विषयात कमी गुण मिळाल्याची ओरड सुरू झाल्याने मूल्यांकनात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याकडे नजरा लागल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत एनएसयूआयचे प्रदेश सचिव संकेत बोके, युवक काँग्रेसचे नीलेश व्यवहारे, आदित्य साखरे, सूरज अढाळक, अनिकेत सातपुते यांच्यासह विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर आक्षेप घेतला.

दोन दिवसांत फेरतपासणीचे अर्ज सादर केले जाणार आहे. १० दिवसांत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत निर्णय झाला आहे. यात विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला, तर याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.

- संकेत बोके, प्रदेश सचिव, एनएसयूआय.

एम.एस्सी. प्रथम वर्ष गणित विषयाचे १५ फेब्रुवारीपर्यंत पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीसाठी अर्ज सादर करावे लागतील. गणित विषयाचा सरासरी निकाल चांगला असतानाही विद्यार्थ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ 

टॅग्स :Studentविद्यार्थी