शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पन्नास ते साठ गुणांचे पेपर सोडवूनही शून्य गुण; विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:40 IST

विद्यार्थ्यांचा मूल्यांकनावर आक्षेप

अमरावती : एम.एस्सी. प्रथम वर्ष सेमिस्टर पॅटर्न हिवाळी २०१९ परीक्षेत गणित विषयात विद्यार्थ्यांना गुण कमी अथवा काहींना शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावरच आक्षेप घेतला आहे. सोमवारी एम.एस्सी.च्या असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक देत प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांची भेट घेत आपबिती कथन करत ठिय्या मांडला. ६० ते ७० गुणांचे पेपर सोडविले असताना शून्य अथवा ५, १० गुण कसे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, विद्याभारती महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागात एम.एस्सी.ला प्रवेशित गणित विषयांच्या विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होता. एनएसयूआयने एम.एस्सी. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. गणित विषयाच्या टोपोलॉजी, अ‍ॅडव्हॉन्स अ‍ॅबस्ट्रॉक पेपरमध्ये मिळालेले गुण फारच कमी आहे. काही विद्यार्थ्यांनी ५० ते ६० गुणांचे प्रश्न सोडविले असताना शून्य गुण कशाच्या आधाराने देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन होत असल्याचा आक्षेप घेतला. स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रियंका उंबरकर या विद्यार्थिनीला अ‍ॅडव्हॉन्स अ‍ॅबस्ट्रॉक पेपरमध्ये केवळ १ गुण मिळाल्याची उत्तरपत्रिका निवेदनासोबत जोडली आहे. हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर होत असताना एम.एस्सी. गणित विषयात कमी गुण मिळाल्याची ओरड सुरू झाल्याने मूल्यांकनात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याकडे नजरा लागल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत एनएसयूआयचे प्रदेश सचिव संकेत बोके, युवक काँग्रेसचे नीलेश व्यवहारे, आदित्य साखरे, सूरज अढाळक, अनिकेत सातपुते यांच्यासह विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर आक्षेप घेतला.

दोन दिवसांत फेरतपासणीचे अर्ज सादर केले जाणार आहे. १० दिवसांत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत निर्णय झाला आहे. यात विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला, तर याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.

- संकेत बोके, प्रदेश सचिव, एनएसयूआय.

एम.एस्सी. प्रथम वर्ष गणित विषयाचे १५ फेब्रुवारीपर्यंत पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीसाठी अर्ज सादर करावे लागतील. गणित विषयाचा सरासरी निकाल चांगला असतानाही विद्यार्थ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ 

टॅग्स :Studentविद्यार्थी