शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वन विभागात बदल्यांचे कठोर नियम आरएफओंना लागू, इतर पदांना मुभा

By गणेश वासनिक | Updated: October 1, 2022 18:18 IST

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कठोर नियमावली; सहायक वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना बदल्यांमध्ये शिथिलता

अमरावती : राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बदल्यांमध्ये कठोर नियम लावले जात असताना उपवनसंरक्षक, सहाय्यक वनरक्षकांपासून कनिष्ठ वनकर्मचाऱ्यांना शासन निर्णयाला डावलून प्रादेशिकमध्ये पोस्टींग दिल्या जातात. इतरांसाठी मात्र, हा निर्णय लागू होताना दिसून येत नाही. अनेक समस्यांनी आरएफओ हे पद सध्या घेरलेले दिसून येते.

राज्याच्या वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे पद हे सर्वात महत्वाचे असून या पदाभोवती वनविभागाचे विकासचक्र फिरत असते. राज्याच्या वनविभागात सामाजिक वनीकरण विभाग वन्यजीव विभाग, प्रादेशिक विभागामध्ये ९२३ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, प्रादेशिक वनविभाग वगळता अन्य विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या पदांपेक्षा सुविधांपासून वंचित असल्याने वनविभागात प्रचंड नाराजी दिसून येते.७५ वर्षानंतरही तेवढीचं पदे

राज्याच्या वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद ७५ वर्षांपासून आहे. आरएफओंची तेवढेच पदे कायम आहे. या कालावधीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची २२ पदे, मुख्य वनसंरक्षकांची ४३ पदे आणि प्रधान मुख्यवन संरक्षकांची ५ पदे वाढली. उपवनसंरक्षकांची ४५ पदे वाढली आहेत. पोलीस निरीक्षक समकक्ष पदाच्या तुलनेत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पदे १० टक्के एवढेच आहेत.साईड पोस्टींग समस्या ग्रस्त

वनविभागात सामाजिक वनीकरण, वन्यजीव, विभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पोस्टींग ही अत्यंत दैनावस्था समजली जाते. तालुका स्तरावरील या पदाला साधे कार्यालय नाही. राज्यात सामाजिक वनीकरणात २५० च्या आसपास परिक्षेत्रांना कार्यालय नाही. तालुका सांभाळत असताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हाताखाली केवळ २ वनकर्मचारी असतात. तुटपुंज्या व्यवस्थेत वनपरिक्षेत्र अधिकारी या ठिकाणी कामे करतात. वेतन वेळेवर मिळत नसल्याचे भीषण वास्तव आहे. शासकीय निवासस्थान सुद्धा बांधून दिल्या जातं नाही.बदल्यांमध्ये भेदभाव का?

वनविभागात इतर सर्वपदांच्या बदल्या झाल्यानंतर अशा पदांवरील वनाधिकारी व कर्मचारी यांना प्रादेशिक ते प्रादेशिक निर्णय डावलुन पोस्टींग मिळते. मात्र, आरएफओंना शासनाचा नियम काटेकोररपणे लावला जातो, सहाय्यक वनसंरक्षक,उपवनसंरक्षक, वनपाल या पदांवरील बदल्या सर्रासपणे प्रादेशिक ते प्रादेशिकमध्ये होतात. हा नियम वरिष्ठ स्तरावर लावल्या जात नाही. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या गेल्या ३ वर्षांपासून विनंतीच्या बदल्या झालेल्या नाही, हा त्यांच्यावरील मोठा अन्याय दिसून येतो.वाहनास इंधन नाही

परिक्षेत्र स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना संकटकालीन व्यवस्था म्हणून शासकीय वाहन मिळाले आहेत. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ४०० वाहनांना गेल्या वर्षभरापासून इंधनासाठी स्वतंत्र अनुदान मिळालेले नाही. परिणामी अनेक वाहने परिक्षेत्र कार्यालय स्तरावर उभी दिसून येतात.

टॅग्स :forest departmentवनविभागTransferबदलीGovernmentसरकार