अमरावती : जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून सतत पाऊस सुरू असल्याने सर्व धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे एक मुख्य व चार मध्यम प्रकल्पांची दरवाजे मंगळवारी सायंकाळनंतर उघडण्यात आले आहे. नदी-नाले ओंथबून वाहत असल्याने नदी नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सर्वच तालुक्यांत पाऊस पडला. २७.२ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. १० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात सार्वत्रिक पाऊस असल्यामुळे पाचही धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवार ते बुधवारी सकाळपर्यंत २४ तासात सर्वाधिक ६६ मि.मी. पाऊस तिवसा तालुक्यात पडला आहे.
दमदार पाऊस : जिल्ह्यातील पाचही धरणाचे दरवाजे उघडले
By admin | Updated: August 13, 2015 00:53 IST