शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कृषी पतपुरवठा निकषात धोरणात्मक बदल हवा, शेतकरी मिशन आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 18:31 IST

राज्य शासनाद्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा लाभ तरी ख-या व गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचतच नाही. कृषी पतपुरवठ्यातदेखील निकष जाचक असल्याने शेतक-यांना लाभ न होता कर्ज वाढतच आहे. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा चिंता व्यक्त केली आहे.

अमरावती - राज्य शासनाद्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा लाभ तरी खºया व गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचतच नाही. कृषी पतपुरवठ्यातदेखील निकष जाचक असल्याने शेतक-यांना लाभ न होता कर्ज वाढतच आहे. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा चिंता व्यक्त केली आहे. योजनांच्या निकषात बदल व अंमलबजावणीसाठी सुधारणा करण्यात यावी, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत जलयुक्त शिवार, कृषिपंपाला वीजपुरवठा, जल नियोजन, जैव संशाधने, कृषी पतपुरवठा, कृषी विमा यांसह राष्ट्रीय योजना व उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राबविले आहेत. मात्र, याचा लाभ खºया व गरजू शेतकºयांना मिळत नसल्याची खंत मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. सिंचन, वीजपुरवठा, ग्रामीण रोजगार, शेतमालास योग्य आधारभूत किंमत यांसह कृषी पतपुरवठा या क्षेत्रात संस्थात्मक व गुणात्मक नियोजन झालेले नाही. शेतमालास उत्पादन खर्चासह आधारभूत किंमत मिळत नाही व त्यांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी कृतीऐवजी प्रयत्न केले जात असल्याचे भासवले जाते. यामधून दलालांचेच पोषण होऊन शेतकºयांची लूट होत असल्याची खंत तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून व्यक्त केली आहे.यावर्षी राज्य शासनाने थकबाकीदार शेतक-यांचे कर्ज माफ केले असले तरी  नाबार्डची कर्जवितरण प्रणाली, व्यापारी बँकांसह जिल्हा बँकांची कृषी पतपुरवठ्याबाबत उदासीनता यामुळेच शेतक-यांना वेळेवर पतपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जमाफीचा उद्देश साध्य होऊ शकणार नाही, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले उचललीत. २०२० पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. सुधारित बियाणे, मृदा आरोग्य कार्ड, शेतीविषयक सुधारणा, सुधारित विमा, सिंचनक्षेत्रात वाढ करणे, ई-बाजार व्यवस्था आदी कार्यक्रम राबविण्यात येत असले तरी यासाठी कृषी मंत्रालयाची जबाबदारी निश्चित करावी व शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांवर नव्याने विचार व्हावा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.

यामध्ये सुधारणा, विस्तार आवश्यकशेतक-यांवर ओढवणा-या संकटांमध्ये भूमी सुधार, अल्प व कोरडवाहू शेतक-यांची संख्या, पाणी व भूमी गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा वापर, पतपुरवठा संस्थांचे  कर्जवाटपाचे नियोजन, शेतक-यांना लाभदायक पीकपद्धती, शोषनविरहित विपणन व्यवस्था यांसह कृषिमूल्य आयोगाचा विास्रा आवश्यक आहे. कृषी विषयाच्या समवर्ती सूचीमध्ये  राज्यांच्या धोरणात्मक अधिकारात वाढ, सुधार व विस्तार यावषयी गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारा केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती