शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कृषी पतपुरवठा निकषात धोरणात्मक बदल हवा, शेतकरी मिशन आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 18:31 IST

राज्य शासनाद्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा लाभ तरी ख-या व गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचतच नाही. कृषी पतपुरवठ्यातदेखील निकष जाचक असल्याने शेतक-यांना लाभ न होता कर्ज वाढतच आहे. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा चिंता व्यक्त केली आहे.

अमरावती - राज्य शासनाद्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा लाभ तरी खºया व गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचतच नाही. कृषी पतपुरवठ्यातदेखील निकष जाचक असल्याने शेतक-यांना लाभ न होता कर्ज वाढतच आहे. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा चिंता व्यक्त केली आहे. योजनांच्या निकषात बदल व अंमलबजावणीसाठी सुधारणा करण्यात यावी, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत जलयुक्त शिवार, कृषिपंपाला वीजपुरवठा, जल नियोजन, जैव संशाधने, कृषी पतपुरवठा, कृषी विमा यांसह राष्ट्रीय योजना व उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राबविले आहेत. मात्र, याचा लाभ खºया व गरजू शेतकºयांना मिळत नसल्याची खंत मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. सिंचन, वीजपुरवठा, ग्रामीण रोजगार, शेतमालास योग्य आधारभूत किंमत यांसह कृषी पतपुरवठा या क्षेत्रात संस्थात्मक व गुणात्मक नियोजन झालेले नाही. शेतमालास उत्पादन खर्चासह आधारभूत किंमत मिळत नाही व त्यांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी कृतीऐवजी प्रयत्न केले जात असल्याचे भासवले जाते. यामधून दलालांचेच पोषण होऊन शेतकºयांची लूट होत असल्याची खंत तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून व्यक्त केली आहे.यावर्षी राज्य शासनाने थकबाकीदार शेतक-यांचे कर्ज माफ केले असले तरी  नाबार्डची कर्जवितरण प्रणाली, व्यापारी बँकांसह जिल्हा बँकांची कृषी पतपुरवठ्याबाबत उदासीनता यामुळेच शेतक-यांना वेळेवर पतपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जमाफीचा उद्देश साध्य होऊ शकणार नाही, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले उचललीत. २०२० पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. सुधारित बियाणे, मृदा आरोग्य कार्ड, शेतीविषयक सुधारणा, सुधारित विमा, सिंचनक्षेत्रात वाढ करणे, ई-बाजार व्यवस्था आदी कार्यक्रम राबविण्यात येत असले तरी यासाठी कृषी मंत्रालयाची जबाबदारी निश्चित करावी व शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांवर नव्याने विचार व्हावा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.

यामध्ये सुधारणा, विस्तार आवश्यकशेतक-यांवर ओढवणा-या संकटांमध्ये भूमी सुधार, अल्प व कोरडवाहू शेतक-यांची संख्या, पाणी व भूमी गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा वापर, पतपुरवठा संस्थांचे  कर्जवाटपाचे नियोजन, शेतक-यांना लाभदायक पीकपद्धती, शोषनविरहित विपणन व्यवस्था यांसह कृषिमूल्य आयोगाचा विास्रा आवश्यक आहे. कृषी विषयाच्या समवर्ती सूचीमध्ये  राज्यांच्या धोरणात्मक अधिकारात वाढ, सुधार व विस्तार यावषयी गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारा केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती