शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंतापदी पदस्थापना रोखली, शासनाला लाखोंचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागातील १४१ कनिष्ठ अभियंता तसेच ५१ सहायक अभियंता श्रेणी-२ यांना उपविभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती ...

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागातील १४१ कनिष्ठ अभियंता तसेच ५१ सहायक अभियंता श्रेणी-२ यांना उपविभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती मिळाली असली तरी पदस्थापना न मिळालेली नाही. याच पदाच्या प्रभाराकरिता शासनाकडून त्यांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत. याकरिता चार महिन्यांतच साडेअकरा लाखांचा भुर्दंड शासनाला बसला आहे.

कनिष्ठ अभियंता पदावरून २०१९-२० च्या निवडसूचीतील १०१ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना महारा

ष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ मधील उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती, तर ४० जणांना याच पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. ५१ सहायक अभियंता श्रेणी-२ यांनाही याच पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी हा आदेश निर्गमित झाला. या निवडसूचीतील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत. ही व्यक्ती आरक्षणाचा लाभ मिळालेली नसावीत, अशा सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेल्याने संपूर्ण निवडसूचीतील पदोन्नती शासनाने रोखली. त्यामुळे १९२ जणांना अतिरिक्त प्रभाराकरिता दरमहा १५०० रुपये याप्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये खर्च होतात. पदोन्नतीचा शासननिर्णय निर्गमित झाल्यापासून अर्थात १२ नोव्हेंबर २०२० पासून शासनाने या पदोन्नत कनिष्ठ अभियंत्यांना ११ लाख ५२ हजार रुपये प्रदान केले आहेत. वर्षभरातील ही रक्कम ३४ लाख ५६ हजार रुपये होणार आहे.

----------

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत येऊन ठेपली निवृत्ती

पदोन्नत झालेल्या अनेक कनिष्ठ अभियंत्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यापूर्वी पदस्थापना मिळाल्यास सन्मानाने निवृत्त होता येईल, अशी भावना त्यांच्यात प्रबळ आहे. विशेष म्हणजे, ऐन निवृत्तीच्या दिवशी काही जणांना पदस्थापना मिळाली आहे. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

-----------एवढी रक्कम शासनाने आपल्या पदरातून देण्याऐवजी सरळ पदस्थापना देऊन टाकावी. दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू झालेली असल्याने पदोन्नती मंजूर केली तरी त्यात शासनाचे नुकसान नाही, झालाच तर कर्मचाऱ्यांचा तोटा आहे. उपविभागाच्या मुख्यालयी नेमणूक मिळाल्यास घरभाडे भत्त्यांची कपात होईल. याबाबत तातडीने पावले उचलली जावीत.

- एस.जी. लाचुरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती