शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

राज्य कोणाचे, चोरट्यांचे की पोलीसांचे ?

By admin | Updated: June 11, 2014 23:00 IST

दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न

अमरावती : दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या महिनाभरात चोरट्यांनी शहरात चोराचा सपाटा लावून २१ घरफोड्या केल्या. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात मोबाईल शॉपी फोडून हजारो रुपयांचा माल चोरुन नेल्याने चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. शहरातील राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे क्रीम ठाणे असल्याचे समजले जात आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग व घरफोड्यांच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी महिनाभरात राजापेठ, गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटनांच्या तुलनेत पोलिसांचे डीटेक्शनचे प्रमाण हे शून्य आहे. त्यामुळे चोऱ्या थांबविण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. चोरट्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे पाहून शहरातील साईनगर परिसरातील काही नागरिक परिसरात काठ्या घेऊन गस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, हे विशेष.