शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राज्य कोणाचे, चोरट्यांचे की पोलीसांचे ?

By admin | Updated: June 11, 2014 23:00 IST

दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न

अमरावती : दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या महिनाभरात चोरट्यांनी शहरात चोराचा सपाटा लावून २१ घरफोड्या केल्या. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात मोबाईल शॉपी फोडून हजारो रुपयांचा माल चोरुन नेल्याने चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. शहरातील राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे क्रीम ठाणे असल्याचे समजले जात आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग व घरफोड्यांच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी महिनाभरात राजापेठ, गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटनांच्या तुलनेत पोलिसांचे डीटेक्शनचे प्रमाण हे शून्य आहे. त्यामुळे चोऱ्या थांबविण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. चोरट्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे पाहून शहरातील साईनगर परिसरातील काही नागरिक परिसरात काठ्या घेऊन गस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, हे विशेष.