शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

राज्यमंत्र्यांचा वीटभट्टी मजुरांच्या मुलांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

वीटभट्टी मजुरांच्या मुलांचे आरोग्य व शिक्षणासंबंधी उपाययोजनांबाबत बडनेऱ्याच्या वीटभट्टी परिसरातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात, सीएस श्यामसुंदर निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख व वीटभट्टी व्यावसायिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ठळक मुद्देबच्चू कडू : मुलांच्या आरोग्य, शिक्षणासाठी कृती आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तात्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी येथे दिले.वीटभट्टी मजुरांच्या मुलांचे आरोग्य व शिक्षणासंबंधी उपाययोजनांबाबत बडनेऱ्याच्या वीटभट्टी परिसरातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात, सीएस श्यामसुंदर निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख व वीटभट्टी व्यावसायिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.उन्हातान्हात राबणाºया वीटभट्टी मजुरांचे आयुष्य कष्टप्रद आहे. त्यांना योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कृती आराखडा तयार करावा. वीटभट्टी कामगार, लहान मुले, स्तनदा मातांसाठी योजना राबविण्यासंदर्भात मिशनमोडवर आराखडा तयार करावा.बडनेरा ते अंजनगाव बारी परिसरात सुमारे ८० वीटभट्ट्या असून, तीनशे ते ३५० कामगार आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजूर कामासाठी कुटुंबासह येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खुंटते व आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. त्यादृष्टीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कामगार विभागाने सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. वीटभट्टी व्यवसाय परिसराचा नकाशा तयार करून त्यात परिसरनिहाय आवश्यक सुविधांसाठी कृती आराखडा करावा, असे निर्देश राज्यमंत्री ना. कडू यांनी दिले.परिसरात आरोग्य तपासणी नियमित व्हावी, शिबिरे घ्यावीत. अंगणवाड्यांतून आहार द्यावा, फिरती पोषण आहार व्यवस्था सुरू करावी. राजीव गांधी पाळणाघर योजनेत स्वयंसेवी संस्थेमार्फत पाळणाघर तत्काळ सुरू करावे. यासाठी आवश्यक फंड उभारण्यात येईल. वीटभट्टीमालक, अधिकारी, कर्मचारी यांनीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.