शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीचा राज्य शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 14:36 IST

आदिवासी समाजाच्या न सुटलेल्या समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. किमान महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी समस्या सुटतील, अशी समाजाची अपेक्षा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालेली नाही. 

ठळक मुद्देदोन वर्षांपासून बैठकच नाहीमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदन

अमरावती : दोन वर्षांपासून जनजाती सल्लागार परिषदेची बैठकच न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी पत्र लिहून परिषदेची बैठक घेऊन आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याची मागणी केलेली आहे.

भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील भाग - ख मधील परिच्छेद ४(१) अनुसार महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाच्या कल्याण योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपाल यांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. या परिषदेचे पुनर्गठन २३ जुलै २०२० रोजी करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून, यात राज्यातील २५ आदिवासी आमदार व चार खासदार आणि आदिवासी संबंधी तज्ज्ञ म्हणून आणखी दोघांचा समावेश आहे.

आदिवासी समाजाच्या न सुटलेल्या समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. किमान महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी समस्या सुटतील, अशी समाजाची अपेक्षा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम, गेल्या ३६ वर्षांपासून रखडलेली अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना, भरती मोहीम, अनुसूचित क्षेत्रातील बेकायदेशीर नगरपंचायती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून जमिनीचे प्रलंबित असलेले पट्टे, वर्षानुवर्षे जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे, गैरआदिवासींनी बळकावलेल्या जमिनी, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात आदिवासींच्या बाजूने दिलेले महत्त्वपूर्ण निर्णय या सर्वांची अंमलबजावणी आदी समस्यांवर चर्चा होत नसल्याने आदिवासी समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत.

वर्षातून चार बैठकी अनिवार्य

राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्गठन व्हायला पाहिजे. वर्षातून किमान चार बैठका झाल्या पाहिजे. परंतु राज्यात सात महिने उशिराने परिषदेचे पुनर्गठन झाले. पुनर्गठन होऊनही एक वर्ष नऊ महिने झाले. तरी अजूनपर्यंत एकही बैठक नाही.

आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. ते निकाली निघावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक