शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीचा राज्य शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 14:36 IST

आदिवासी समाजाच्या न सुटलेल्या समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. किमान महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी समस्या सुटतील, अशी समाजाची अपेक्षा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालेली नाही. 

ठळक मुद्देदोन वर्षांपासून बैठकच नाहीमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदन

अमरावती : दोन वर्षांपासून जनजाती सल्लागार परिषदेची बैठकच न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी पत्र लिहून परिषदेची बैठक घेऊन आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याची मागणी केलेली आहे.

भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील भाग - ख मधील परिच्छेद ४(१) अनुसार महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाच्या कल्याण योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपाल यांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. या परिषदेचे पुनर्गठन २३ जुलै २०२० रोजी करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून, यात राज्यातील २५ आदिवासी आमदार व चार खासदार आणि आदिवासी संबंधी तज्ज्ञ म्हणून आणखी दोघांचा समावेश आहे.

आदिवासी समाजाच्या न सुटलेल्या समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. किमान महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी समस्या सुटतील, अशी समाजाची अपेक्षा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यापासून या परिषदेची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम, गेल्या ३६ वर्षांपासून रखडलेली अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना, भरती मोहीम, अनुसूचित क्षेत्रातील बेकायदेशीर नगरपंचायती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून जमिनीचे प्रलंबित असलेले पट्टे, वर्षानुवर्षे जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे, गैरआदिवासींनी बळकावलेल्या जमिनी, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात आदिवासींच्या बाजूने दिलेले महत्त्वपूर्ण निर्णय या सर्वांची अंमलबजावणी आदी समस्यांवर चर्चा होत नसल्याने आदिवासी समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत.

वर्षातून चार बैठकी अनिवार्य

राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्गठन व्हायला पाहिजे. वर्षातून किमान चार बैठका झाल्या पाहिजे. परंतु राज्यात सात महिने उशिराने परिषदेचे पुनर्गठन झाले. पुनर्गठन होऊनही एक वर्ष नऊ महिने झाले. तरी अजूनपर्यंत एकही बैठक नाही.

आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. ते निकाली निघावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक