शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

अमरावतीत आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:21 IST

आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे शनिवारी थाटात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या ६१ व्या राष्ट्रीय परिषदेला भारताच्या चांद्रयान मोहिमेत सहभागी तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देहंसराज अहीर उपस्थित : मेघे अभियांत्रिकीत शास्त्रज्ञांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे शनिवारी थाटात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या ६१ व्या राष्ट्रीय परिषदेला भारताच्या चांद्रयान मोहिमेत सहभागी तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे, आयईटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिनी देशमुख, आयईटीई अमरावतीचे अध्यक्ष प्रशांत इंगोले, अमोल बोडखे, प्राचार्य एम.एस. अली उपस्थित होते.आविष्कार व संशोधन आपल्या देशाची परंपरा असल्याचे सांगत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आयईटीई तसेच विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कौतुक केले. विदेशातही पाऊल ठेवलेल्या आयईटीईने अमरावतीला राष्ट्रीय परिषदेचा मान देऊन या शहराची अभियांत्रिकी क्षेत्रात ओळख प्रस्थापित केल्याचे ते म्हणाले. ‘विद्यार्थी देश की ताकत है, इन्हे और मजबूत बनाने की जरूरत है’ असे सूचक उद्गार त्यांनी काढले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी ना. अहीर यांचे आभार मानले. उपस्थित सर्व सन्माननीय शास्त्रज्ञांचे स्वागत केले. डॉ. एम.एन. हुडा यांनी तांत्रिक बाबी, उद्याचे तंत्रज्ञान व महाविद्यालय यांच्यातील दरी दूर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी पद्मश्री लेफ्टनंट कर्नल दिवाकर सेन यांनी शास्त्रज्ञांचा परिचय दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. रेड्डी यांनी उपस्थित संशोधकांचे अभिनंदन केले. संचालन निकू खालसा व मैथिली देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात प्रशांत इंगोले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व आयईटीईची कार्यकक्षा स्पष्ट केली.चांद्रयान-२ चे उपसंचालक डॉ. चंद्रकांता कुमार, डॉ. इस्रोचे संचालक सिवन, ट्रायचे माजी अध्यक्ष टी.एस. चौधरी, पद्मश्री डॉ. टी. हनुमान चौधरी, फ्री टू एअर संकल्पनेचे जनक आर. के. गुप्ता, डीआरडीओचे के. लक्ष्मीनारायण, अमेरिकेच्या हॅडली विद्यापीठाचे डॉ. प्रसाद शास्त्री व वेल लॅबचे माजी संचालक डॉ. एम.एच. कोरी, डॉ. कासट, डॉ. अजय ठाकरे, प्रा. संजय धोपटे, डॉ. एच.आर. देशमुख व आयईटीईचे पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यांना केले पुरस्कृतडीआरडीओमध्ये ३७ वर्षे प्रकल्प संचालक म्हणून सेवा देणारे के. लक्ष्मीनारायण तसेच टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात ४० वर्षे सेवा देणारे डॉ. एन.एच. कोरी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिल्ली आयईटीई सेंटरला उत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांक पुरस्कार बंगळुरू सेंटरने पटकावला. उपकेंद्राचा पुरस्कार यवतमाळला देण्यात आला.आज-उद्या शोधनिबंध सादरीकरणराष्ट्रीय परिषदेत ९० संशोधक व १२० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शोधनिबंधांचे सादरीकरण होत आहे. याशिवाय १२० शाळकरी मुलांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी मेघे अभियांत्रिकीच्या आवारात होत आहे. या प्रदर्शनाचे अवलोकन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.