शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

जंगलातील वनवणवा नियंत्रणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’चे आदेश : विभागस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनक्षेत्र अथवा जंगलातील वनवणवा नियंत्रणास रविवार, १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले आहे. वनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना देण्यात आल्या असून, वन बीटनिहाय आग नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. जंगलात कृत्रिम आग लागल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित वनकर्मचारी, अधिकारी कारवाईचे लक्ष्य असेल. विभागस्तरावर वनवणवा संरक्षण चमूंचे कक्ष स्थापन केले जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली. यात मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे आदींनी कर्मचाऱ्यांना वनवणवा नियंत्रणासाठी टिप्स दिल्यात. १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान जंगलात जाळ रेषा तयार करणे, आगीवर नियंत्रणासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक झाली. व्याघ्र प्रकल्पासह राखीव वने, प्रादेशिक वन विभागाचे जंगलाच्या वनवणव्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश आहे.वनवणवा नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग, साहित्य, नियंत्रण कक्ष आणि वनवणवा स्थळांवर सूक्ष्म लक्ष आहे. वनवणवा नियंत्रणास प्रारंभ झाला.- गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :forestजंगलfireआग